शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सोशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; १९ वर्षीय तरुणीस अटक, दाोघांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 13:04 IST

या तिघांनी धर्मगुरूबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंदाजे पाच हजार नागरिक रविवारी रात्री १० च्या सुमारास कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले हाेते.

ठळक मुद्देकामठीत तगडा पोलीस बंदोबस्त

कामठी (नागपूर) : साेशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व पाेस्ट प्रकरणात कामठी पाेलिसांनी एका १९ वर्षीय तरुणीस साेमवारी (दि. १३) अटक केली असून, अन्य दाेघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने आराेपी तरुणीस एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आराेपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी (दि. १२) रात्री कामठी शहरातील दाेन्ही पाेलीस ठाण्यांना घेराव केल्याने शहरात तणाव निर्माण झाला हाेता. साेमवारी शहरातील तणाव निवळला असून, जनजीवन सुरळीत हाेते.

कामठी पाेलिसांनी या प्रकरणात कामठी शहरातील काटी ओळ भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीस अटक केली असून, रौनीभाई उर्फ रौनक यादव व अमन मेमन दाेघेही (रा. कामठी) यांचा शाेध सुरू केला आहे. या तिघांविरुद्ध कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात भादंवि २९५, १५३, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. आराेपी तरुणीला साेमवारी सकाळी कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने तिला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अन्य दाेन आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या तिघांनी धर्मगुरूबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंदाजे पाच हजार नागरिक रविवारी (दि. १२) रात्री १० वाजताच्या सुमारास कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले हाेते. नागरिकांनी घाेषणाबाजी करीत कामठी (नवीन) व कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याला घेराव केल्याने तसेच शहरातून जाणारा नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याने तणाव निर्माण झाला हाेता.

पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व प्रमुख पाेलीस अधिकारी रविवारी रात्री कामठी शहरात दाखल झाले हाेते. अमितेश कुमार यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळत नागरिकांना शांत केल्याने मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तणाव निवळला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पाेलीस दल, अतिशीघ्रकृती दल तसेच नागपूर शहर व ग्रामीण पाेलिसांची अतिरिक्त कुमक बाेलावण्यात आली हाेती.

वाहनांसह हाॅटेलवर दगडफेक

संतप्त नागरिकांनी कामठी शहरातून गेलेला नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग अडविल्याने या महामार्गाच्या दाेन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. या महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली हाेती. काहींनी मध्यरात्री महामार्गावरील वाहनांसह पाेलीस ठाण्यासमाेरील हाॅटेलवर दगडफेक केली हाेती. यात वाहने व हाॅटेलच्या काचा फुटल्या असून, कोणालाही दुखापत झाली नाही. पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी, उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित, गजानन राजमाने, सहायक पाेलीस उपायुक्त नयन आलूरकर यांच्यासह पाेलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

संवेदनशील भागात पाेलिसांचा रूट मार्च

या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पाेलिसांनी पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी यांच्या नेतृत्वात साेमवारी शहरातील इस्माईलपुरा, विणकर कॉलनी, जयभीम चौक, कामगारनगर, लकडगंज, गवळीपुरा, जयस्तंभ चौक, हरदासनगर, हैदरी चौक, मोंढा, मोदी पडाव, राम मंदिर, कादर झेंडा, खलासी लाईन, संजयनगर, भाजी मंडी, बोरकर चौक, कोळसा टाळ, रब्बानी चौक, इमलीबाग, वारीसपुरा, फुटाना ओळ, फेरूमल चौक, शुक्रवारी बाजार, गोयल टाॅकीज चौक, महात्मा गांधी चौक, मेन रोड मार्गे रूट मार्च काढला. यात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, अतिशीघ्रकृती दल तसेच सशस्त्र पाेलीस जवान सहभागी झाले हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर