शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सोशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; १९ वर्षीय तरुणीस अटक, दाोघांविरुद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2022 13:04 IST

या तिघांनी धर्मगुरूबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंदाजे पाच हजार नागरिक रविवारी रात्री १० च्या सुमारास कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले हाेते.

ठळक मुद्देकामठीत तगडा पोलीस बंदोबस्त

कामठी (नागपूर) : साेशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व पाेस्ट प्रकरणात कामठी पाेलिसांनी एका १९ वर्षीय तरुणीस साेमवारी (दि. १३) अटक केली असून, अन्य दाेघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने आराेपी तरुणीस एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आराेपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी (दि. १२) रात्री कामठी शहरातील दाेन्ही पाेलीस ठाण्यांना घेराव केल्याने शहरात तणाव निर्माण झाला हाेता. साेमवारी शहरातील तणाव निवळला असून, जनजीवन सुरळीत हाेते.

कामठी पाेलिसांनी या प्रकरणात कामठी शहरातील काटी ओळ भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीस अटक केली असून, रौनीभाई उर्फ रौनक यादव व अमन मेमन दाेघेही (रा. कामठी) यांचा शाेध सुरू केला आहे. या तिघांविरुद्ध कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात भादंवि २९५, १५३, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. आराेपी तरुणीला साेमवारी सकाळी कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने तिला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अन्य दाेन आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या तिघांनी धर्मगुरूबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंदाजे पाच हजार नागरिक रविवारी (दि. १२) रात्री १० वाजताच्या सुमारास कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले हाेते. नागरिकांनी घाेषणाबाजी करीत कामठी (नवीन) व कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याला घेराव केल्याने तसेच शहरातून जाणारा नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याने तणाव निर्माण झाला हाेता.

पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व प्रमुख पाेलीस अधिकारी रविवारी रात्री कामठी शहरात दाखल झाले हाेते. अमितेश कुमार यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळत नागरिकांना शांत केल्याने मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तणाव निवळला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पाेलीस दल, अतिशीघ्रकृती दल तसेच नागपूर शहर व ग्रामीण पाेलिसांची अतिरिक्त कुमक बाेलावण्यात आली हाेती.

वाहनांसह हाॅटेलवर दगडफेक

संतप्त नागरिकांनी कामठी शहरातून गेलेला नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग अडविल्याने या महामार्गाच्या दाेन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. या महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली हाेती. काहींनी मध्यरात्री महामार्गावरील वाहनांसह पाेलीस ठाण्यासमाेरील हाॅटेलवर दगडफेक केली हाेती. यात वाहने व हाॅटेलच्या काचा फुटल्या असून, कोणालाही दुखापत झाली नाही. पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी, उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित, गजानन राजमाने, सहायक पाेलीस उपायुक्त नयन आलूरकर यांच्यासह पाेलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

संवेदनशील भागात पाेलिसांचा रूट मार्च

या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पाेलिसांनी पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी यांच्या नेतृत्वात साेमवारी शहरातील इस्माईलपुरा, विणकर कॉलनी, जयभीम चौक, कामगारनगर, लकडगंज, गवळीपुरा, जयस्तंभ चौक, हरदासनगर, हैदरी चौक, मोंढा, मोदी पडाव, राम मंदिर, कादर झेंडा, खलासी लाईन, संजयनगर, भाजी मंडी, बोरकर चौक, कोळसा टाळ, रब्बानी चौक, इमलीबाग, वारीसपुरा, फुटाना ओळ, फेरूमल चौक, शुक्रवारी बाजार, गोयल टाॅकीज चौक, महात्मा गांधी चौक, मेन रोड मार्गे रूट मार्च काढला. यात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, अतिशीघ्रकृती दल तसेच सशस्त्र पाेलीस जवान सहभागी झाले हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर