शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:16 AM

अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.

ठळक मुद्देरथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्रा आसनस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.भगवानाच्या रथाच्या स्वागतासाठी मार्ग मोकळा करीत भाविक पुढे जात होते. सोबतच गंगाजलाने वातावरण शुद्ध करण्यात येत होते. भव्य आणि सुशोभित केलेल्या रथावर पुरोहित भगवानाची सेवा करीत होते. मार्गात पुष्पवृष्टी करून भगवानाचे स्वागत करण्यात आले. कुकडे ले-आऊटच्या विविध मार्गाने रथयात्रा समाज भवनात पोहोचली. येथे भगवानाची पूजा करून त्यांची मूळ स्थानी स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी भवनात भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राच्या सोबत चक्र सुदर्शनची मूळ स्थानावर पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांना बाहेर आणण्यात आले. येथे अभिषेक व पूजनानंतर त्यांना रथावर स्थापन करण्यात आले. रथावर स्थापना केल्यानंतर पुन्हा भगवानाची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर रथाला ओढण्यात आले. मार्गात भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी जय जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, हरि बोल हरि बोलच्या कीर्तनांवर भाविक थिरकताना दिसले. संस्थेचे अध्यक्ष अनुप सत्पती यांनी सांगितले की, उपनिषद आणि पुराणात शरीराला रथ संबोधण्यात आले आहे. जेव्हा या शरीररुपी रथात बसलेल्या आत्मारुपी सारथीच्या मदतीने मनाला आवर घालून इंद्रियरुपी घोड्यांना श्रेष्ठ मार्गाकडे वाटचाल करतो तेव्हा हा रथ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रभुची कृपा सर्वांवर समान रूपाने होते. आमच्या जीवनाचा रथ गतिमान असला पाहिजे. आम्ही आपल्या जीवनाला गतिमान करून राष्ट्र, समाज आणि आत्मोन्नतीसोबत मानवतेची सेवा केली पाहिजे. हीच भगवानाची सर्वात मोठी सेवा आहे. हाच रथयात्रेचा संदेश आहे. यशस्वितेसाठी उपाध्यक्ष एस. एच. नंदा, सचिव एस. दास, गणेश दास, पी. पी. मिश्रा यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर