शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:19 IST

अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.

ठळक मुद्देरथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्रा आसनस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.भगवानाच्या रथाच्या स्वागतासाठी मार्ग मोकळा करीत भाविक पुढे जात होते. सोबतच गंगाजलाने वातावरण शुद्ध करण्यात येत होते. भव्य आणि सुशोभित केलेल्या रथावर पुरोहित भगवानाची सेवा करीत होते. मार्गात पुष्पवृष्टी करून भगवानाचे स्वागत करण्यात आले. कुकडे ले-आऊटच्या विविध मार्गाने रथयात्रा समाज भवनात पोहोचली. येथे भगवानाची पूजा करून त्यांची मूळ स्थानी स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी भवनात भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राच्या सोबत चक्र सुदर्शनची मूळ स्थानावर पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांना बाहेर आणण्यात आले. येथे अभिषेक व पूजनानंतर त्यांना रथावर स्थापन करण्यात आले. रथावर स्थापना केल्यानंतर पुन्हा भगवानाची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर रथाला ओढण्यात आले. मार्गात भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी जय जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, हरि बोल हरि बोलच्या कीर्तनांवर भाविक थिरकताना दिसले. संस्थेचे अध्यक्ष अनुप सत्पती यांनी सांगितले की, उपनिषद आणि पुराणात शरीराला रथ संबोधण्यात आले आहे. जेव्हा या शरीररुपी रथात बसलेल्या आत्मारुपी सारथीच्या मदतीने मनाला आवर घालून इंद्रियरुपी घोड्यांना श्रेष्ठ मार्गाकडे वाटचाल करतो तेव्हा हा रथ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रभुची कृपा सर्वांवर समान रूपाने होते. आमच्या जीवनाचा रथ गतिमान असला पाहिजे. आम्ही आपल्या जीवनाला गतिमान करून राष्ट्र, समाज आणि आत्मोन्नतीसोबत मानवतेची सेवा केली पाहिजे. हीच भगवानाची सर्वात मोठी सेवा आहे. हाच रथयात्रेचा संदेश आहे. यशस्वितेसाठी उपाध्यक्ष एस. एच. नंदा, सचिव एस. दास, गणेश दास, पी. पी. मिश्रा यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर