शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उडिया समाजाने नागपूरच्या कुकडे ले आऊटमधून काढली जगन्नाथ रथयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:19 IST

अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.

ठळक मुद्देरथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्रा आसनस्थ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अजनीच्या कुकडे ले-आऊट येथील उडिया समाज सांस्कृतिक भवन मंदिरातून शनिवारी भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढण्यात आली. रथावर भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राला आसनस्थ करून रथयात्रा काढण्यात आली. रथाला ओढत भाविक पुढे चालत होते. समोरच्या भागात महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश धारण करून चालत होत्या. मागे युवती आणि महिला इस्कॉन भजन मंडळीच्या ‘हरे रामा-हरे कृष्णा’च्या भजनावर नृत्य करीत पुढे चालत होत्या.भगवानाच्या रथाच्या स्वागतासाठी मार्ग मोकळा करीत भाविक पुढे जात होते. सोबतच गंगाजलाने वातावरण शुद्ध करण्यात येत होते. भव्य आणि सुशोभित केलेल्या रथावर पुरोहित भगवानाची सेवा करीत होते. मार्गात पुष्पवृष्टी करून भगवानाचे स्वागत करण्यात आले. कुकडे ले-आऊटच्या विविध मार्गाने रथयात्रा समाज भवनात पोहोचली. येथे भगवानाची पूजा करून त्यांची मूळ स्थानी स्थापना करण्यात आली. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यापूर्वी सकाळी भवनात भगवान जगन्नाथ, प्रभू बलभद्र आणि देवी सुभद्राच्या सोबत चक्र सुदर्शनची मूळ स्थानावर पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांना बाहेर आणण्यात आले. येथे अभिषेक व पूजनानंतर त्यांना रथावर स्थापन करण्यात आले. रथावर स्थापना केल्यानंतर पुन्हा भगवानाची पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर रथाला ओढण्यात आले. मार्गात भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी जय जगन्नाथ स्वामी नयन पथगामी, हरि बोल हरि बोलच्या कीर्तनांवर भाविक थिरकताना दिसले. संस्थेचे अध्यक्ष अनुप सत्पती यांनी सांगितले की, उपनिषद आणि पुराणात शरीराला रथ संबोधण्यात आले आहे. जेव्हा या शरीररुपी रथात बसलेल्या आत्मारुपी सारथीच्या मदतीने मनाला आवर घालून इंद्रियरुपी घोड्यांना श्रेष्ठ मार्गाकडे वाटचाल करतो तेव्हा हा रथ आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रभुची कृपा सर्वांवर समान रूपाने होते. आमच्या जीवनाचा रथ गतिमान असला पाहिजे. आम्ही आपल्या जीवनाला गतिमान करून राष्ट्र, समाज आणि आत्मोन्नतीसोबत मानवतेची सेवा केली पाहिजे. हीच भगवानाची सर्वात मोठी सेवा आहे. हाच रथयात्रेचा संदेश आहे. यशस्वितेसाठी उपाध्यक्ष एस. एच. नंदा, सचिव एस. दास, गणेश दास, पी. पी. मिश्रा यांनी परिश्रम घेतले. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमnagpurनागपूर