शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पेट्रोकेमिकल रिफायनरीतून सहा हजार कोटींची बचत व औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:07 IST

Nagpur News जर विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह रिफायनरीदेखील आली तर औद्योगिक विकासाला गती मिळेल. शिवाय इंधनातूनच सहा हजार कोटींची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देइंधनामुळे होईल सहा हजार कोटींची बचत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या दिशेने पावले उचलणे सुरू झाल्याने रिफायनरी स्थापन होण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. परंतु रिफायनरीचे समर्थन करणारे तज्ज्ञ अद्यापही निराश झालेले नाहीत. जर विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससह रिफायनरीदेखील आली तर औद्योगिक विकासाला गती मिळेल. शिवाय इंधनातूनच सहा हजार कोटींची बचत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत नागपुरात स्थित पेट्रोलियम कंपन्यांच्या डेपोमध्ये इंधन येत आहे. रिफायनरी बनली तर पाईपलाईनच्या माध्यमातून क्रूड ऑईल येईल. सध्या रिफायनरीतून इंधन आणण्यासाठी प्रतिलिटर जवळपास चार रुपयांचा खर्च होत आहे. पाईपलाईनमधून क्रूड ऑईल आणले तर हा खर्च ३० पैसे प्रतिलिटर होईल. रिफायनरीतून येणाऱ्या सहा कोटी टन क्रूड ऑईलमध्ये ३० टक्के इंधनाचे उत्पादन होईल. याचप्रकारे मध्य भारतातील जबलपूर, रायपूरसारख्या शहरांत पाईपलाईन टाकून पेट्रोलियम उत्पादनांचा वाहतूक खर्च वाचविला जाऊ शकतो. मुंबई-मनमाडमध्ये हा प्रकार यशस्वी झाला आहे. या पूर्ण प्रक्रियेत आताच्या तुलनेत सहा हजार कोटींची बचत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

याचप्रकारे क्रूड ऑईलच्या ४० टक्के भागातून पेट्रोकेमिकल उत्पादन तयार होतील. कृषी, औषधी, फर्निचर, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल उद्योगाला याचा फायदा होईल. विदर्भात या क्षेत्राशी जुळलेले उद्योग येतील. याचप्रमाणे क्रूड ऑईलच्या उरलेल्या घटकांपासून पेट कोक तयार होईल. त्याचा उपयोग डांबराच्या रूपात होऊ शकेल.

रिफायनरीचे इतर फायदे

-रिफायनरीला पाणी दिल्याने मनपाचे उत्पन्न वाढेल.

-रिफायनरी १०० कोटी खर्च करून विदर्भातील बांध स्वच्छ करून पाणी संग्रह क्षमता वाढवेल. विदर्भ सिंचन विकास महामंडळाला फायदा होईल.

-समृद्धी महामार्गाच्या बाजूने पाईपलाईन टाकल्यावर एमएसआरडीसीला ५० पैसे प्रतिलिटरच्या दराने भाडे मिळेल. महामार्ग बांधणीसाठी घेण्यात आलेले कर्ज पाच वर्षांत संपेल.

-ग्रीन रिफायनरी असल्याने यातून निघणाऱ्या सल्फर वगैरेचा उपयोग खत बनविण्यासाठी होईल.

-रिफायनरीच्या जवळपास कृषी, औषध, फर्निचर, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल उद्योगांना प्रोत्साहन मिळेल.

विदर्भात येईल औद्योगिक क्रांती

रिफायनरी आल्यानंतर विदर्भात औद्योगिक क्रांती येईल. पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रित होतील. सोबतच इतर उद्योगांना देखील याचा फायदा होईल. एमआयडीसी व मिहानमध्ये रिकाम्या पडलेल्या भूखंडांची मागणी वाढेल, असे मत रिफायरनरी-पेट्रोकेमिकल क्षेत्राचे तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Petrolपेट्रोल