शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:07 IST

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारची उदासिनता, नियोजनाचा अभाव आणि अर्ज करण्यासाठी असलेल्या अडचणी यामुळे दहावीनंतर ...

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारची उदासिनता, नियोजनाचा अभाव आणि अर्ज करण्यासाठी असलेल्या अडचणी यामुळे दहावीनंतर शिक्षण घेणारे व पात्र असूनही शिष्यवृत्तीसाठी अर्ज न करणाऱ्या मागासवर्गीयांची संख्या महाराष्ट्रात कमालीची घसरली आहे. तब्बल ५ लाखांवर मागासवर्गीय विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायचे, ती संख्या २०२०-२१ मध्ये अवघी १५ हजारांवर आली आहे, ही शोकांतिका आहे.

केंद्र व राज्य सरकारतर्फे दहावीनंतर मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या भरवश्यावर लाखो मागासवर्गीय विद्यार्थी शिकले. उच्च शिक्षण घेतले. अनेकांनी परदेशात जाऊनही शिक्षण घेतले आणि आपले व देशाचे नाव उज्ज्वल केले. परंतु मागील काही वर्षांपासून राज्य सरकारने एकूणच शिष्यवृत्तीबाबत कमालीचे उदासीन धोरण अवलंबिल्याचे दिसून येते. त्याचा फटका शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर पडत आहे. अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी नाही, मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे पात्र विद्यार्थ्यांचे वेळेवर अर्जच सादर होत नाहीत. परिणामी केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीसाठी मिळणारा निधीही कमी-कमी होत आहे. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाचा विचार केला तर तब्बल ५ लाख ७९ हजार २७४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. २०२०-२१ मध्ये ही संख्या १५,६२९ इतकी होती. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येचा हा घसरलेला ग्राफ चिंतेची बाब आहे.

विशेष म्हणजे शिष्यवृत्तीत पारदर्शकता यावी आणि लााभार्थी विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी केंद्र सरकारने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्याचे पालन झाले तर हा प्रश्न सहज सुटू शकतो. परंतु केंद्र सरकारच्या या गाईडलाईनसुद्धा राज्य सरकारने लागू केल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकार मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.

- बॉक्स

दहा वर्षांतील शिष्यवृत्तीची परिस्थिती

वर्ष लाभार्थी विद्यार्थी

२०११-१२ - ४,१६,४८५

२०१२-१३ - ४,८३,३८७

२०१३-१४ - ३,९६,२९६

२०१४-१५ - ३,४२,१०८

२०१५-१६ - ५,७९,२७४

२०१६-१७ -४,३५,२९२

२०१७-१८ - २,२७,४८०

२०१८-१९- ३,०९,२८२

२०१९-२० - २,६६,०१३

२०२०-२१ - १५,६२९

- असे आहेत केंद्राचे दिशानिर्देश

- महाविद्यालयात प्रवेश घेतानाच शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यात यावा.

- प्रत्येक महाविद्यालयात शिष्यवृत्तीची कामे पाहण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी. त्याचा खर्च केंद्र सरकार करेल

- शिष्यवृत्तीचे ऑडिट व्हावे.

- उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय महाविद्यालय व सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वय असावा

- जून महिन्यात शिष्यवृत्तीचा अर्ज आला तर ऑगस्टमध्ये निधी मिळेल.

- अर्ज करण्यासाठी शक्यतोवर नॅशनल स्कॉलरशीप पोर्टलचा वापर करावा

- कोट

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी राज्य सरकारची असलेली यंत्रणा दोषपूर्ण आहे. ही यंत्रणा अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिष्यवृत्तीसंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या दिशानिर्देशांची राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी.

अतुल खोब्रागडे,

सामाजिक कार्यकर्ते