शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
4
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
5
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
6
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
7
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
8
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
9
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
10
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
11
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
12
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
13
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
15
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
16
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
17
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
18
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
19
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
20
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार

आता मिळणार का कापसाला भाव?

By admin | Updated: December 5, 2015 09:10 IST

शेतकऱ्यांच्या पिकांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कापसाला प्रति क्ंिवटल ६ हजार रुपये भाव मिळावा तसेच सोयाबीन व धानालासुद्धा योग्य भाव मिळावा, ...

भाजपनेच केली होती मागणी : फडणवीस, खडसे आणि मुनगंटीवार राहायचे आग्रहीआनंद डेकाटे  नागपूरशेतकऱ्यांच्या पिकांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील कापसाला प्रति क्ंिवटल ६ हजार रुपये भाव मिळावा तसेच सोयाबीन व धानालासुद्धा योग्य भाव मिळावा, अशी मागणी आताचे सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टीनेच उचलून धरली होती. या मागणीसाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्यासह सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सभागृह दणाणून सोडले होते. आता फडणवीस खुद्द मुख्यमंत्री आहेत. मुनगंटीवार हे वित्तमंत्री तर खडसे हे महसूल मंत्री आहेत. तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकांना आणि विशेषत: कापसाला योग्य भाव मिळेल का, असा प्रश्न हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या दयनीय प्रश्नाबाबत जेव्हा कधी चर्चा होते, तेव्हा कापसाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले आहे. त्यांना शेती परवडणारी राहिलेली नाही. त्यातूनच आत्महत्या वाढलेल्या आहेत, असेच सांगितले जाते. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यायचाच असेल तर कापसाला प्रति क्विंटल ६ हजार रुपये आणि सोयाबीनला ३ व धानाला २ हजार रुपये हमी भाव दिला पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीनेच विधानसभेत उचलून धरली होती. यासंदर्भात अनेकदा विशेष चर्चा सुद्धा उपस्थित केल्या होत्या. प्रत्येक चर्चेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथराव खडसे आणि सुधीर मुनगंटीवार हे शेतकऱ्यांचे विशेषत: कापूस उत्पादकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीने मांडायचे.२०११ साली हिवाळी अधिवेशनादरम्यान एकनाथराव खडसे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून कापसाला ६ हजार, सोयाबीनला ३ हजार आणि धानाला २ हजार रुपये भाव मिळावा, या मागणीचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा त्यावर बोलतांना ते भावनिक झाले होते. ते म्हणाले होते की ‘ मी स्वत: कापूस व केळी उत्पादक शेतकरी आहे. मी कसणारा शेतकरी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मी जाणतो. एका बाजूला सर्व वस्तूंच्या किमती वाढत असतंना सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस का धरत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. इतकेच नव्हे तर कृषी मूल्य आयोगाची कापसाची भाव ठरविण्याची पद्धतच मुळाच चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले होते. १२ डिसेंबर २०१३ साली अतिवृष्टीवरील चर्चेत बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी , विदर्भात कापसाला ४ हजार रुपये दर परवडू शकत नाही, असे स्पष्ट केले होते. कृषी मूल्य समितीने शिफारस केलेली किंमत आणि केंद्र शासनाच्या एमएसपी यात मोठी तफावत असल्यामुळे विदर्भातील कापूस, धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होत असल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच ही तफावत दूर करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बोनस द्यावा. तसेच शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘मगरमच्छ के आँसू’ न वाहता त्यांना तातडीने मदत करावी, आग्रही भूमिका मांडली होती सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा १२ डिसेंबर २०१३ रोजी आयोजित दुष्काळावरील चर्चेवर बोलतांना शासनाला चांगलेच धारेवर धरले होते. शेतकऱ्यांनी धान्य पिकविले नाही तर आपले काय होईल, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकरी कडक उन्हात नांगरटी, वखरटी करतो. पावसाळ्यात साप, नाग, विंचूची चिंता न करता चिखल तुडवितो थंडीत आपल्या मुलांना आपल्या छातीशी कवटाळून झोपावे, असे वाटत असतांना रानडुकरांपासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताची राखणी करतो परंतु त्या शेतकऱ्याच्या नशिबी शासन केवळ तीन साडेतीन हजार रुपयाची नुकसान भरपाई देतो, याने काय होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. कापूस उत्पादकाची परिस्थिती अजूनही तशीच आहे. कापसाला आजही ६ हजार रुपये भाव मिळालेला नाही. भाजपची सत्ता आहे आणि तिन्ही प्रमुख नेते आज महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्यामुळे यंदा तरी कापूस उत्पादकांना न्याय मिळेल का, असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे.