शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष गोपाल देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:23 IST

विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकला.

ठळक मुद्देवणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ ला होणार  संमेलन

आॅनलाईन लोकमतनागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कवी सुधाकर गायधनी यांनी नाकारल्यानंतर, आयोजन समितीने या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, विचारवंत व लेखक डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची निवड करून, संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या वादावर पडदा टाकला.वणी येथे १९ ते २१ जानेवारी २०१८ ला विदर्भ साहित्य संघाचे संमेलन होणार आहे. संघाच्या कार्यपद्धतीनुसार अध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यात आली होती. त्यात कवी सुधाकर गायधनी यांची अध्यक्षपदासाठी निवड केली होती. गायधनी यांनी संघाला ही निवड आपल्याला मान्य नसल्याचे लेखी कळविले होते. त्यामुळे संघाने डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांची संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. देशपांडे हे मूळचे वर्धेचे असून, त्यांनी विज्ञान कवी म्हणून साहित्य क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांचा ‘लिटमस’ हा कवितासंग्रह, आठ कादंबऱ्या , नाटक, सैद्धांतिक लेखन, गीतकविता आणि राजा शहाजी ही महाकादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांच्या ‘अरण्यकांड’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. विदर्भातील वाङ्मयीन चळवळींशी त्यांचा निकटचा संबंध आहे. पथनाट्याचे आणि विज्ञान कवितेचे प्रवर्तक म्हणून ते महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अध्यक्षतेखाली वणी येथे होणारे संमेलन यश्स्वी होईल, असा विश्वास आयोजन समितीने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर