शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आता चित्रनगरीसाठी प्रयत्न व्हायला हवे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:04 IST

विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअ.भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला सिने अभिनेत्री व महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, अभिनेते भारत गणेशपुरे, वैभव तत्त्ववादी, कवी रामदास फुटाणे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आ. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा सभापती नागेश सहारे, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर, राज कुबेर, प्रेमा किरण, समृद्धी पोरे, चैत्राली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले म्हणाले की, विदर्भातील मोठी मंडळी सिनेसृष्टीत काम करीत आहे. विदर्भात नवोदित कलावंतही मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्यासाठी महामंडळाचे विदर्भातील कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे. महामंडळाचे विदर्भात चित्रनगरी साकार करण्याचे स्वप्न आहे. विदर्भातील कार्यालयाकडून नक्कीच त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. विदर्भात गुणी कलावंत मोठ्या संख्येने आहेत. येथील भौगोलिक क्षेत्रसुद्धा सिनेमासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांनी विदर्भात चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलावंतांना संधी द्यावी, असे आवाहन वर्षा उसगावकर यांनी केले. विदर्भात चित्रपटाचे शुटींग झाले पाहिजे, चित्रपट निर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज असल्याचे मत भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी सांस्कृतिक धोरण समितीने चित्रनगरीचा प्रस्ताव शासनाला दिला होता, शासनानेही तो मान्य केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र दुरुगकर व रूपाली कोंडेवार - मोरे यांनी केले.

टॅग्स :cinemaसिनेमाnagpurनागपूर