शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

आता चित्रनगरीसाठी प्रयत्न व्हायला हवे : ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:04 IST

विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअ.भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ हा कलावंतांचा खजिना आहे. विदर्भाने चित्रपटसृष्टीत नामांकित कलावंत दिले आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची विदर्भातील शाखा सुरू व्हायला तब्बल ५० वर्षांचा कालखंड लोटला. महत्प्रयासाने विदर्भाचे कार्यालय सुरू झाल्यामुळे आता वैदर्भीय कलावंतांचा पुढचा प्रयत्न चित्रनगरीसाठी असायला हवा, अशी भावना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी व्यक्त केली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विदर्भ शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला सिने अभिनेत्री व महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासह महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, अभिनेते भारत गणेशपुरे, वैभव तत्त्ववादी, कवी रामदास फुटाणे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, आ. अनिल सोले, उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा सभापती नागेश सहारे, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर, राज कुबेर, प्रेमा किरण, समृद्धी पोरे, चैत्राली डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.मंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले म्हणाले की, विदर्भातील मोठी मंडळी सिनेसृष्टीत काम करीत आहे. विदर्भात नवोदित कलावंतही मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांच्यासाठी महामंडळाचे विदर्भातील कार्यालय महत्त्वाचे ठरणार आहे. महामंडळाचे विदर्भात चित्रनगरी साकार करण्याचे स्वप्न आहे. विदर्भातील कार्यालयाकडून नक्कीच त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. विदर्भात गुणी कलावंत मोठ्या संख्येने आहेत. येथील भौगोलिक क्षेत्रसुद्धा सिनेमासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शकांनी विदर्भात चित्रपटाची निर्मिती करून स्थानिक कलावंतांना संधी द्यावी, असे आवाहन वर्षा उसगावकर यांनी केले. विदर्भात चित्रपटाचे शुटींग झाले पाहिजे, चित्रपट निर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज असल्याचे मत भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी सांस्कृतिक धोरण समितीने चित्रनगरीचा प्रस्ताव शासनाला दिला होता, शासनानेही तो मान्य केला असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रवींद्र दुरुगकर व रूपाली कोंडेवार - मोरे यांनी केले.

टॅग्स :cinemaसिनेमाnagpurनागपूर