शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

आता, गरिबांची आर्थिक विवंचना दूर करा! नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:52 PM

बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या दूर करण्याचे प्रयत्न करावे, असा मौलिक सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्दे‘भावसुमनांची ओंजळ’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाबासाहेबांचे लंडनमधील घर विकत घेऊन राजकुमार बडोले यांनी देशाला एक आंतरराष्ट्रीय स्मारक दिले आहे. त्यांनी सामाजिक न्याय देण्याचे प्रयत्न अग्रक्रमाने केले आहे. आता, त्यांनी इनोव्हेशन, डेव्हलपमेंटचा विचार तळागाळातल्या आर्थिक विवंचनेत जगणाऱ्यांची समस्या दूर करण्याचे प्रयत्न करावे, असा मौलिक सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, लघु व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे दिला.युगंधर क्रिएशन्सच्या वतीने शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित सोहळ्यात, शारदा बडोले यांच्या ‘भावसुमनांची ओंजळ’ या पहिल्याच कवितासंग्रहाचे प्रकाशन गडकरी यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध आंबेडकरी विचारक रावसाहेब कसबे, माजी मंत्री राजकुमार बडोले, वनराई फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी.एस. थूल, लेखिका जुल्फी शेख उपस्थित होते. याप्रसंगी दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उदारमतवाद आणि दहशतवाद अशा दोन मतांचा फार मोठा वैचारिक संघर्ष जगात सुरू आहे. भगवान बुद्धाने दिलेला जगण्याचा संदेश अखिल मानवतेसाठीचा आहे. त्याच्या विचारांची प्रेरणा बाबासाहेबांनी घेतली आणि सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडली आहे. आता त्यापुढे जाऊन, ज्ञान-विज्ञानाच्या बाबतीत काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. विज्ञान आधारित आर्थिक प्रगती व विकासाच्या मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांना डिझेलमुक्त करण्याचे कार्य सुरू झाले असून, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तणसापासून बायोसीएनजीचे २०० प्रकल्प उभे राहू शकतात आणि १० हजारांवर युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने कार्य करण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. याप्रसंगी रावसाहेब कसबे यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. संदेश वाघ यांनी केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. डॉ. अनिल खोब्रागडे व प्रख्यात गायिका बेला शेंडे यांनी कवितासंग्रहातील दोन गीतांची प्रस्तुती दिली.शारदा यांना अपघातशारदा बडोले यांना सकाळी बागेत फिरताना अपघात झाल्याने, त्या प्रकाशन सोहळ्याला हजर राहू शकल्या नाही. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीliteratureसाहित्य