शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 10:16 IST

स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणांचा संकल्पनागपुरात ठरली व्यूहरचना

नरेश डोंगरे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : कानून के हात बहोत लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. यापुढे आता कानून के हात लंबे आणि खूप सारे असणार आहे. होय, स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे. या एकत्रित हाताच्या बळकटीतून नक्षल चळवळीची मानगूट आवळण्याची व्यूहरचना शुक्रवारी नागपुरात आयोजित विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.भारतातील अनेक राज्याच्या सुरक्षा यंत्रणांपुढे नक्षलवाद डोकेदुखीचाच विषय आहे. राज्याच्या राजधानीच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती १९८२ ला झाली. निसर्गाने वनवैभवाची, खनिजाची गडचिरोली-गोंदियावर मुक्त उधळण केली आहे. मात्र, नक्षल्यांनी या जिल्ह्याच्या विकासाला अशी काही उधळी लावली की येथील जनजीवन प्रचंड दहशतीत आले. नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या हिंसक घटना घडवून ३५ वर्षांत पोलीस खबरे असल्याच्या संशयावरून ४७४ सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या. वेळोवेळी घातपात घडवून १९१ पोलिसांचे जीव घेतले. कर्तव्यावर असलेल्या ५११ पोलिसांना जीवघेण्या जखमा दिल्या. पोलिसांसोबत विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या २० जणांना क्रूरपणे मारले. तोडफोड, जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी आतापर्यंत २९ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले. हे केवळ एकट्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भयावह चित्र आहे. असेच किंवा याहीपेक्षा भयावह चित्र छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये आहे. अबूझमाड, दंतेवाडा हे परिसर नक्षल्यांच्या गुहा मानल्या जातात. नक्षलवादाचा साप कधी अन् कुठे वळवळेल आणि कुणाचा बळी घेईल, याचा काहीच नेम नाही. केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त राज्य सरकार आपापल्या परीने तीन दशकांपासून नक्षलवादाविरोधात झुंजत आहे. मात्र, नक्षलवाद संपण्याऐवजी वाढतच आहे. अलीकडे नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा फायदा झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह अनेक भागातील नक्षलवाद बॅकफूटवर आहे. त्याला तसाच मागे सारण्यासाठी विविध राज्यातील पोलिसांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ), आयटीबीपीचेही पाठबळ मिळाले आहे. या सर्वांनी मिळून नक्षलवादाविरुद्ध एक नवी आक्रमक ‘आॅपरेशन’ची तयारी चालवली आहे.त्यासाठी येथील नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ) सुराबर्डीतील केंद्रात शुक्रवारी विविध राज्यातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, एएनओचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) डी. कनकरत्नम, बालाघाटचे एडीजी श्री जनार्धन त्याचप्रमाणे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील २८ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. वरिष्ठांच्या आदेशावरून एएनओचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. एका राज्यात घातपात करून बाजूच्या राज्यात पळून जायचे. तेथे काही दिवस थांबल्यानंतर तेथील नक्षल्यांकडून घातपात करवून पुन्हा दुसऱ्या राज्यात पळून जायची नक्षली नेत्यांची क्लृप्ती यापुढे चालू द्यायची नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.नेते अन रसद पुरविणाऱ्यांवर नजरविविध राज्यातील शिर्षस्थ नक्षली नेते, दलम कमांडर आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची, त्यांच्या कार्यपद्धतीची बारीकसारीक माहिती एक दुसऱ्यांना पुरवून नक्षल्यांचे कटकारस्थान उधळून लावण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. नक्षल्यांना रसद पुरविणाऱ्यांवर कडक नजर ठेवतानाच नक्षली नेते, फ्रंटल आॅर्गनायझेशनवरही सूक्ष्म नजर ठेवून नक्षल चळवळीची मानगूट पकडण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला.सुरक्षा यंत्रणांच्या या बळकट एकत्रीकरणातून भविष्यात चांगले परिणाम बघायला मिळेल,असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद