शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

आता मतमोजणी केंद्रात ‘आंब्याची मोजणी’ !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 8, 2024 00:01 IST

- रस्त्यावर टाकलेली ताडपत्री वादळी पावसाने फाटली : फळविक्रेत्यांनी सभागृहात तळ ठोकला

नागपूर : कळमना बाजार समितीच्या आवारातील फळ बाजारपेठेत तयार झालेल्या मतमोजणी केंद्राच्या हॉलमध्ये फळ विक्रेते, शेतकरी आणि कमिशन एजंटांनी तळ ठोकला आहे. या सभागृहात मतमोजणीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समध्ये आंबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी निवडणूक झाली. ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी नागपूर येथील कळमना मार्केट यार्डातील लिलाव हॉल क्रमांक-३ मध्ये नागपूर मतदारसंघ आणि क्रमांक-४ मध्ये रामटेक मतदार संघाची मतमोजणी तर लिलाव हॉल क्रमांक-५ मध्ये भोजन आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिनांक १ व २ मे रोजी व्यापाऱ्यांना नोटीसा देऊन ५ मेपर्यंत जागा रिकामी करण्यास सांगण्यात आले होते. सात दिवसांपूर्वी सभागृह क्रमांक-४ मध्ये मतमोजणीसाठी बॅरिकेड्स लावण्याचे काम सुरू झाले. दुसरीकडे विविध फळांच्या लिलावाची व्यवस्था करण्यासाठी फळ बाजारात रस्त्यावरच ताडपत्री टाकण्यात आली. मात्र, मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने ताडपत्री फाटली. त्यानंतर फळ व्यापाऱ्यांनी हॉल क्रमांक-४ मध्ये तळ ठोकून आंबा आदी फळे तेथेच ठेवली. अडतिया पांडे म्हणाले, शेतकऱ्यांनी आंबा बाजारात ठेवला होता. पावसामुळे खराब होण्याच्या भीतीने शेतकरी व व्यापाऱ्यांना सभागृहाकडे जावे लागले.

२० मेपर्यंत सवलतजिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मतमोजणी जागेची पाहणी केली आणि मागणीनुसार व्यापाऱ्यांना २० मेपर्यंत व्यवसायाची मुदत दिली. फ्रूट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पर्यायी जागेची मागणी केली होती. मात्र व्यापाऱ्यांऱ्ना रस्त्यावरच ताडपत्री टाकून फळ विक्रीची व्यवस्था करून देण्यात आली. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या फळांचे नुकसान होत आहे. मागणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २० मेपर्यंत मुदत दिली.

दररोज एक कोटींचे नुकसान !असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, लिलावाच्या तात्पुरत्या व्यवस्थेमुळे बाजारात विक्रीसाठी माल आणणाऱ्या १०० हून अधिक शेतकऱ्यांना दररोज एक कोटीचा फटका बसत आहे. फळांचा योग्य लिलाव होत नाही आणि किरकोळ विक्रेते माल खरेदीसाठी येत नाहीत. निवडणुकीची मतमोजणी अन्यत्र करण्याची बाजार समितीतील विविध असोसिएशनची गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी आहे. मात्र, मागणीकडे नेहमीच कानाडोळा करण्यात येतो.

 

टॅग्स :nagpurनागपूर