शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

आता ‘कोरोना’वरच ‘कर्फ्यू’ लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:32 IST

आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

ठळक मुद्देनियम आणि दिशानिर्देश पाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जनता कर्फ्यू’च्या निमित्ताने नागरिकांनी आपण मनात आणले तर काहीही करू शकतात. हे दाखवून दिले आहे. याच पद्धतीची जीवनशैली भविष्यात प्रत्येकाने अमलात आणावी. आपल्याला कोरोनावर ‘कर्फ्यू’ लावायचा आहे आणि स्वत:ला अनलॉक करायचे आहे. त्यासाठी नियमांचे बंधन स्वत:वर ठेवावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात पुन्हा लॉकडाऊन करावे की नाही यावर मत-मतांतरे सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवस जनता कर्फ्यूची संकल्पना समोर आली. नागपूरकरांनी या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र या दोन दिवसानंतर नागरिकांनी पुन्हा गर्दी करु नये. जे नियम कोविड-१९ चे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आखून देण्यात आले आहेत, त्या नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि शासनाच्या दिशानिर्देशाचे पालन व्हावे. चेहऱ्यावर मास्क, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. फिजिकल अंतराचे पालन व्हावे, याची काळजी दुकानदारांनी घ्यायला हवी. प्रत्येक दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था असायलाच हवी. सम-विषम नियमाचे पालन, सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेतच दुकाने उघडी असायला हवी.

दुचाकीवर एका व्यक्तीपेक्षा अधिक व्यक्ती असू नये. चार चाकीमध्ये टू प्लस वन हा नियम पाळायला हवा. विनाकारण घराबाहेर पडू नये. नको तेथे गर्दी करु नये, हे नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज मुळीच पडणार नाही. नियमांचे पालन करूनच कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे, असेही तुकाराम मुंढे म्हणाले.

दंड वसुली हा हेतू नाहीमास्क न वापरणे, दुकानांसंदर्भात असलेल्या नियमांचे उल्लंघन करणे यासाठी दंड आकारण्यात येतो. या दंडाची रक्कमही वाढविण्यात आली आहे. दंड वसूल करणे हा मनपाचा उद्देश नाही. नियमांचे पालन सक्तीने व्हावे, ही त्यामागील भूमिका आहे. 

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस