शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आता चारही सिग्नल अर्धा मिनिट बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:26 IST

सिग्नल बंद असताना आणि सिग्नल सुरू होताच वाहनचालकांकडून वाहन पळविण्याची घाई करण्यात येते. त्यामुळे पायी रस्ता ओलांडणारांना वाहनांचा कट लागून नेहमी अपघात होतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपाययोजना केली आहे. खास पायी रस्ता ओलांडणारांसाठी आता व्हेरायटी चौकातील चारही सिग्नल एकाच वेळी ३० सेकंदासाठी बंद केले जातील. या अर्ध्या मिनिटात चारही सिग्नल लाल राहतील अन् ही वेळ फक्त पायी चालणारांसाठी राखीव राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी आज पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देपायी रस्ता ओलांडणारांसाठी विशेष उपक्रम : नागपूर वाहतूक पोलिसांचा प्रयोग सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिग्नल बंद असताना आणि सिग्नल सुरू होताच वाहनचालकांकडून वाहन पळविण्याची घाई करण्यात येते. त्यामुळे पायी रस्ता ओलांडणारांना वाहनांचा कट लागून नेहमी अपघात होतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून अभिनव उपाययोजना केली आहे. खास पायी रस्ता ओलांडणारांसाठी आता व्हेरायटी चौकातील चारही सिग्नल एकाच वेळी ३० सेकंदासाठी बंद केले जातील. या अर्ध्या मिनिटात चारही सिग्नल लाल राहतील अन् ही वेळ फक्त पायी चालणारांसाठी राखीव राहील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी आज पत्रकारांना दिली.शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधार करण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यातीलच एक म्हणून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. बरेच वेळा वाहनचालक पायी चालणारांचा विचारच करीत नाही. प्रत्येक बाजूच्या वाहनचालकाला सिग्नल सुरू होताच आपले वाहन दामट्याची घाई झाली असते. त्यामुळे पायी चालणारे,विशेषत: वृद्ध नागरिकांना त्याचा मोठा त्रास होतो. अनेकदा अपघातही घडतात. ते टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व्हेरायटी चौकात प्रायोगित तत्त्वावर हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झांशी राणी चौकातही असाच प्रयोग करण्यात येणार आहे. त्यानुसार, १२९ सेकंदानंतर चारही सिग्नल्स एकाच वेळी लाल होतील. ३० सेकंद ते लाल राहतील. या वेळेत कोणत्याही दिशेला उभा असलेले पायी चालणारे रस्ता ओलांडू शकतील. या वेळेत चौकातून कोणत्याही दिशेने वाहन धावणार नाही. सिग्नलच्या खांबावर असलेल्या ध्वनिक्षेपकातून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना हिंदी आणि मराठीतून पोलीस सूचनाही देतील. त्याचप्रमाणे चारही सिग्नल लाल होईस्तोवर पादचाºयांना रस्त्याच्या बाजूला थांबण्याच्या सूचना मेगाफोनद्वारे वाहतूक पोलीस करणार आहेत. बुधवारपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी उपायुक्त रोशन यांनी केले.मोबाईलवर डीजी लॉकरवाहनचालकांना वाहनांची कागदपत्रे आणि चालक परवाना सोबत बाळगण्याची यापुढे गरज नाही. मोबाईलवर डीजी लॉकर हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामध्ये वाहनांची कागदपत्रे आणि चालकाचा परवाना सेव्ह केला जाऊ शकतो. गरज पडल्यास वाहतूक पोलिसांना ते दाखवता येते. कागदपत्र तपासण्यासाठी वाहतूक पोलीस सहकाऱ्यांना (पोलीस मित्रांना) सोबत ठेवतात. ही मंडळी लाच घेण्याचे काम करीत असल्याचा आरोप होतो, असे निदर्शनास आणून दिले असता अशा कर्मचाऱ्याचा थेट फोटो पाठवून तक्रारी करण्याचे आवाहन उपायुक्त रोशन यांनी केले. हप्तेखोर पोलिसांमुळे अनेक भागातून आॅटो तसेच खासगी वाहनचालक मनमानी पद्धतीने तसेच अवैध वाहतूक करतात, हा मुद्दा उपस्थित झाला असता संबंधितांकडून तक्रार आल्यास ठोस कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त रोशन म्हणाले. लाचखोरांची गय केली जाणार नाही. आतापर्यंत १० वादग्रस्त पोलीस कर्मचारी मुख्यालयात पाठविण्यात आले तर काहींची गुप्त चौकशी सुरू असल्याचेही रोशन यांनी पत्रकारांना सांगितले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर