शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

स्वस्त विजेसाठी आता सर्वांचेच लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:04 IST

Nagpur : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वीजदर सरासरी १० टक्क्यांनी कमी होणार, महावितरण सुप्रीम कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाने महावितरणला झटका देत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाने २५ जून रोजी ठरवलेल्या वीजदरांवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राज्यात २८ मार्च २०२५ रोजी ठरवलेले दर लागू झाले आहेत. महावितरणच्या सूत्रांनुसार, यामुळे राज्यात विजेचे दर सरासरी १० टक्क्यांनी कमी होतील. मात्र, महावितरणने हायकोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्वस्त विजेसाठी आता सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे.

महावितरणच्या बहुवार्षिक दरनिर्धारण याचिकेवर जनसुनावणी घेत राज्य नियामक आयोगाने २८ मार्च २०२५ रोजी वर्ष २०३० पर्यंतसाठी वीजदर निश्चित केले होते. यात सरासरी १० टक्क्यांची कपात करण्यात आली होती. हे नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार होते. मात्र, आयोगाच्या नोंदींमध्ये झालेल्या त्रुटींचा दाखला देत महावितरणने पुनर्विचार याचिका दाखल केली. आयोगाने या याचिकेवर निर्णय येईपर्यंत २०२४-२५ सालचेच दर कायम ठेवण्याचे जाहीर केले.

महावितरणचा दावा होता की, आयोगाने घरगुती ग्राहकांचे दर कमी करण्याऐवजी औद्योगिक दरांमध्ये मोठी कपात केली. आयोगाने पुनर्विचार याचिकेवर २५ जून रोजी निर्णय देत नवे दर जाहीर केले. हे दर २०२४-२५ च्या तुलनेत कमी, पण २८ मार्चच्या दरांपेक्षा अधिक होते. मात्र रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड या कंपनीने या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली. न्यायालयाने आयोगाचा २५ जूनचा निर्णय रद्द केला. न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले की आयोगाने स्टेकहोल्डरचा अभिप्राय न घेता याचिका मंजूर केली आणि नियामक तरतुदी व नैसर्गिक न्यायाची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरला.

ऊर्जा तज्ज्ञ आर.बी. गोयंका यांनी सांगितले की, आयोगाने जून २५ मध्ये ठरवलेले दर मार्च २५ च्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी अधिक होते. त्यामुळे आता मार्च २५ चे दर लागू झाल्याने ग्राहकांना सुमारे १० टक्क्यांची सूट मिळेल. व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांचे दरही कमी होतील, ज्यामुळे उद्योगांचे स्थलांतर थांबवण्यास मदत होईल.

राज्यात टॅरिफ घोटाळा

राज्यात वीज टैरिफ घोटाळा झाला असल्याचा आरोप माजी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. आयोगाच्या निर्णयाविरुद्ध महावितरणने केवळ चार दिवसांत पुनर्विचार याचिका दाखल केली, याबाबत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. ही बाब प्रक्रियेचे उल्लंघन करणारी आहे. आयोगानेही जनसुनावणी न घेता २५ जून रोजी वीज दर जाहीर केले, हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टीओडी टॅरिफवर परिणाम नाही

आयोगाने या वर्षी औद्योगिक ग्राहकांप्रमाणेच घरगुती ग्राहकांनाही टीओडी (टाइम ऑफ द डे) टैरिफचा लाभदेण्याचा निर्णय घेतला आहे कारण आयोगाच्या दोन्ही निर्णयांमध्ये याचा उल्लेख आहे, त्यामुळे ग्राहकांना याचा लाभ मिळत राहील. यानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत ग्राहकांना प्रति युनिट ८० पैसे सूट मिळेल. मात्र, यासाठी टीओडी मीटर बसवणे आवश्यक आहे.

घरगुती दरांतील फरकश्रेणी                       मार्च २५             जून २५० ते १००                 ४.७१ रुपये         ४.४३ रुपये१०१ ते ३००             १०.२९ रुपये        ९.६४ रुपये३०१ ते ५००             १४.५५ रुपये       १२.८३ रुपये                   ५०० पेक्षा अधिक     १६.७४ रुपये        १४.३३ रुपये 

English
हिंदी सारांश
Web Title : Lower electricity rates hinge on Supreme Court decision now!

Web Summary : Bombay High Court froze revised power tariffs, reverting to cheaper March 2025 rates. Mahavitaran appeals to the Supreme Court. Consumers await potentially lower electricity bills, industries anticipate relief, and a tariff scam is alleged.
टॅग्स :electricityवीजSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरmahavitaranमहावितरण