कुख्यात गुन्हेगार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:23+5:302021-03-07T04:09:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : दाेन टाेळींतील वैमनस्यातून देशी कट्ट्यातून गाेळीबार करीत प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात ...

कुख्यात गुन्हेगार अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : दाेन टाेळींतील वैमनस्यातून देशी कट्ट्यातून गाेळीबार करीत प्रतिस्पर्धी गुन्हेगाराला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहरातील सिव्हिल लाइनमधील आकाशवाणी चाैकात शुक्रवारी (दि. ५) सकाळी अटक केली. ताे ८ एप्रिल २०१३ पासून पसार असल्याने पाेलीस त्याच्या मागावर हाेते.
जयसिंग अशरफीलाल यादव (३९, रा. चाेरबाहुली, ता. रामटेक) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. जयसिंग व माेनिश रेड्डी हे दाेघेही कुख्यात गुन्हेगार असून, त्यांच्या टाेळ्या आहेत. अवैध धंद्यांमधील हस्तक्षेपामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे व्हायची. त्यातच ८ एप्रिल २०१३ राेजी कन्हान (ता. पारशिवनी) येथील नाका क्रमांक-७ जवळ जयसिंगने माेनिशवर देशी कट्ट्यातून गाेळीबार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यामुळे कन्हान पाेलिसांनी या प्रकरणात जयसिंगसह त्याच्या याेगेश यादव, राजा यादव, विपीन गाेंडाने, उमेश यादव, जीवन ठवकर व प्रशांत येलेकर या साथीदारांविरुद्ध भादंवि ३०७ आणि आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा नाेंदिवला हाेता. त्यावेळी जयसिंग पसार झाला हाेता, तर त्याच्या इतर साथीदारांना कन्हान पाेलिसांनी अटक केली हाेती.
तेव्हापासून कन्हान पाेलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर हाेते. ताे शुक्रवारी सकाळी नागपूर शहरातील आकायावाणी चाैकात असलेल्या चहा टपरीवर थांबला असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेत अटक केली व कन्हान पाेलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, हवालदार नाना राऊत, दिनेश आधापुरे, अमाेल वाघ, विपीन गायधने, प्रणय बनाफर, नम्रता बघेल, साहेबराव बहाळे, अमाेल कुथे यांच्या पथकाने बजावली.
...
तात्पुरता अंतरिम जामीन खारीज
यजसिंगला कायद्याच्या कचाट्यातून पळवाटा काढणे चांगले ठाऊक आहे. घटनेनंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे अर्ज करून तात्पुरता अंतरिम जामीन मिळवला हाेता. मात्र, नियमानुसार त्याने तपासकार्यात पाेलिसांना सहकार्य केले नाही तसेच ताे कधीच पाेलिसांसमाेर हजर झाला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याचा तात्पुरता अंतरिम जामीन खारीज केला हाेता. त्यानंतर ताे पसार झाला. त्यातच नागपूर ग्रामीण पाेलीस त्याचा आठ वर्षांपासून शाेध घेत हाेते.