शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

लॉकडाऊनमुळे नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 10:25 IST

कोरोना लॉकडाऊनने नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात आला असून शालेय सिझनसाठी उत्पादन ठप्प झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असून दुकानांमध्ये असलेला माल विक्रीविना पडून आहे. यामुळे पेपर ट्रेडर्स आणि स्टेशनर्सला आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशाळा सुरू झाल्यानंतर होणार तुटवडा, दर वाढणार

आनंद शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनने नोटबुक व स्टेशनरीचा व्यवसाय संकटात आला असून शालेय सिझनसाठी उत्पादन ठप्प झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असून दुकानांमध्ये असलेला माल विक्रीविना पडून आहे. एप्रिलमध्ये शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणारा नोटबुक आणि स्टेशनरीचा पुरवठा बंद आहे. यामुळे पेपर ट्रेडर्स आणि स्टेशनर्सला आतापर्यंत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.कोट्यवधींचा फटकापेपर ट्रेडर्स असोसिएशनचे सदस्य संजय खुळे म्हणाले, नोटबुक, रजिस्टर आणि स्टेशनरीकरिता नागपूर मध्य भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. येथून नागपूरसह संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नोटबुक, रजिस्टर आणि स्टेशनरीचा पुरवठा होतो. गांधीबाग, इतवारी, टेलिफोन एक्स्चेंज चौक येथील बहुतांश घरांमध्ये नोटबुक, रजिस्टर तयार होतात. एमआयडीसी क्षेत्रात काही कारखान्यांमध्ये निर्मिती होते. शालेय सिझनकरिता जानेवारीत पेपरची खरेदी करण्यात येते तर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये नोटबुक, रजिस्टर तयार केले जातात. पण लॉकडाऊनमुळे या कामावर परिणाम झाला असून एप्रिलमध्ये शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोटबुक आणि रजिस्टरचा पुरवठा झाला नाही. यामुळे शहरातील प्रमुख ३०० नोटबुक आणि रजिस्टर व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यास नोटबुक आणि रजिस्टरचा तुटवडा होऊन दर वाढू शकतात. .नुकसानीतून बाहेर येण्यास लागणार तीन वर्षेविदर्भ पेन अ‍ॅण्ड स्टेशनर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनदास आहुजा म्हणाले, स्टेशनरीचे आॅर्डर जानेवारीपासून घेणे सुरू होते. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये उत्पादन होऊन शाळांच्या माध्यमातून पुरवठा करण्यात येतो. पण यंदा लॉकडाऊनमुळे स्टेशनरीचे उत्पादन झाले नाही. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर तुटवडा होणार आहे. दर वाढू शकतात. स्टेशनरीचा बराच माल ट्रान्सपोर्टमध्ये अडकला आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये स्टेशनर्सला ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नागपुरात ३५० पेक्षा जास्त स्टेशनर्स आहेत. त्यांना नुकसान भरून काढण्यासाठी तीन वर्षे लागणार आहे.वीज बिल व कर्जावरील व्याजात शासनाने सूट द्यावीनोटबुक व स्टेशनरी व्यापाऱ्यांना होणारे नुकसान पाहता सरकारने वीज बिल व कर्जावरील व्याजात सूट देण्याची विनंती असोसिएशनने सरकारकडे केली आहे. सीसी लिमिटवरील व्याज माफ करणे, कर्मचाºयांचे वेतन ३० टक्के देण्याची मागणी मान्य करणे आणि करात सवलत देण्याची मागणी केली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस