शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

राजनेता नव्हे, जनसहभागातून भारत बनेल विश्वगुरू : आनंद कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:35 IST

प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देसेवासदन संस्थेचा रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताचा इतिहास अतिशय संपन्न आहे. त्या इतिहासाचे अवलोकन केल्यास आपले भविष्य खूप उज्ज्वल आहे, असे जाणवेल. परंतु एखादा राजकारणी येऊन आपल्या देशाला महासत्ता बनवेल, हा विचार मनातून काढून टाका. एखादा नेता फारतर सहकार्य करेल पण प्रयत्न प्रत्येकालाच करायचे आहेत. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा विश्वास पटणा, बिहारचे ‘सुपर ३०’चे संस्थापक आनंद कुमार यांनी व्यक्त केला.सेवासदन शिक्षण संस्थेच्या ९३ व्या वर्धापन दिननिमित्त विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण-प्रबोधन पुरस्कार समारोहाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. यावेळी आनंद कुमार बोलत होते. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून यंदा हा पुरस्कार श्री मंगल बहुउद्देशीय शिक्षण, तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेद्वारा संचालित सावनेरच्या मूकबधिर निवासी शाळा या संस्थेला देण्यात आला. ५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी गोयल गंगा ग्रुपचे संचालक अतुल गोयल, आमदार नागो गाणार, सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव इंदूबाला मुकेवार, पुरस्कार समितीच्या कार्याध्यक्षा वासंती भागवत, पुरस्कारप्राप्त संस्थेचे संस्थापक नारायण समर्थ प्रामुख्याने उपस्थित होते.आनंद कुमार यांनी पुढे बोलताना, १०, २०, ३० वर्षात एक वेळ येईल जेव्हा भारत विश्वगुरू बनेल आणि युरोप, अमेरिकेचेही लोक नागपूरसह भारतात शिक्षण आणि येथील रुग्णालयात उपचारासाठी येतील. त्यासाठी प्रत्येकाचा सहभाग आवश्यक आहे. रमाबाई रानडे यांनी १०० वर्षापूर्वी शिक्षणाचे महत्त्व ओळखून महिलांच्या शिक्षणासाठी कार्य केले, म्हणून आज असंख्य महिला पुढे जात आहेत. सेवासदन किंवा पुरस्कार घेणाऱ्या श्री मंगल संस्थेसारख्या अनेक संस्था, असंख्य लोक समाजाच्या उत्थानासाठी कार्य करीत आहेत. अशा संस्थांना, लोकांना प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. केवळ प्रोत्साहन देऊन होणार नाही तर स्वत: त्या कामात सहभागी व्हा. देशात आजही दलित, वंचित, मागासवर्गीय मुले, महिला शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर आहेत. अशा गरजवंतांसाठी वेळ काढून थोडे कार्य करा. प्रत्येक मुलांवर विश्वास ठेवा, त्यांच्यात डॉक्टर, वैज्ञानिक, नोबेल प्राप्त करण्याच्या संभावना आहेत. हे काम करताना अनेक अडचणी येतील, पण धैर्याने, संयमाने काम करीत राहिल्यास यश मिळेल व भारत महासत्ता होईल,असे आवाहन आनंद कुमार यांनी केले.यावेळी अतुल गोयल यांनी, रमाबाई रानडे यांच्या कार्याचे कौतुक केले. ज्या समाजात महिलांना सन्मान मिळतो, तो समाज आणि देश समृद्ध होतो. मात्र पुरुषप्रधान मानसिकतेचा देश महासत्ता बनू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाचे बाजारीकरण झालेल्या काळात आनंद कुमार यांच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. मात्र आता शिक्षकांमध्ये नैतिकतेचा अभाव दिसून येत असल्याची खंत व्यक्त करीत या कामात साधनेचा भाव येईपर्यंत आपण महाशक्ती बनू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन गडकरी यांनी केले तर संचालन आशुतोष अडोणी यांनी केले.गडकरी दाम्पत्याचे कौतुकआनंद कुमार यांनी यावेळी देशभरात हायवेचे जाळे पसरविणारे नितीन गडकरी सर्वाधिक कार्यक्षम मंत्री असल्याची भावना व्यक्त केली. मात्र महिलांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या कांचन गडकरी यांचे कार्य त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मराठी लोक बिहारी माणसांना पळवून लावतात, असे बोलले जाते पण नागपुरात माझे नेहमी प्रेमाने स्वागत झाले, त्यामुळे मला असे जाणवत नाही, असे बोलताच सभागृहात हंशा पिकला.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर