शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘बिग-बी’ ची जागा कुणीही घेऊ शकत नाही : अभिषेक बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 20:32 IST

बॉलिवुडचे ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मीसुद्धा नाही. रिमेक अािण सिक्वेलच्या या काळात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात त्यांच्या भूमिका करणे अत्यंत कठीण आहे. कुणीही असा प्रयत्न करू नये. त्यांच्या कामाची स्टाईल सर्वात वेगळी असल्याचे अभिषेक बच्चन यांनी सांगितले. ‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आलेल्या चित्रपटातील कलाकारांसोबत अभिषेक बच्चन यांनी लोकमतशी संवाद साधला.

ठळक मुद्दे‘मनमर्जिया’ चित्रपटाचे प्रमोशन : चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस खरा उतरेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॉलिवुडचे ‘बिग-बी’ अमिताभ बच्चन यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. मीसुद्धा नाही. रिमेक अािण सिक्वेलच्या या काळात अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात त्यांच्या भूमिका करणे अत्यंत कठीण आहे. कुणीही असा प्रयत्न करू नये. त्यांच्या कामाची स्टाईल सर्वात वेगळी असल्याचे अभिषेक बच्चन यांनी सांगितले.‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागपुरात आलेल्या चित्रपटातील कलाकारांसोबत अभिषेक बच्चन यांनी लोकमतशी संवाद साधला.दोन वर्षांच्या कालावधीनंतर ‘मनमर्जिया’ चित्रपटातून कमबॅक करण्याच्या प्रश्नावर ज्युनिअर बच्चन यांनी सांगितले की, जे काम करायचे, ते चांगले आणि मनपासून केले पाहिजे. प्रेक्षकांना आमचे काम पसंत आले पाहिजे. ‘मनमर्जिया’ची कथा चांगली वाटली म्हणून हा चित्रपट केला. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, अनुराग कश्यप नव्हे तर आनंद एल राय चित्रपट घेऊन माझ्याकडे आले होते. दिग्दर्शनासाठी अनुराग बेस्ट चॉईस आहे. चित्रपटात तीन एकदम वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर आहेत.चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकेवर तापसी पन्नू म्हणाली, हे चांगले आहे की मला वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट मिळत आहेत. हॉरर ते कॉमेडी आणि गंभीर चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या मुल्क चित्रपटाचे क्रिटिक आणि सर्वसामान्य प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवर तापसी म्हणाली, पुरस्कार मिळावा या उद्देशाने चित्रपट करीत नाही. चित्रपटाचे बॉक्स आॅफिसवर होणारे कलेक्शन महत्त्वाचे आहे. प्रेक्षक पैसे खर्च करून सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी येतात. त्यांचे मनोरंजन झाले पाहिजे. चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर मिळणारे यश हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. हिंदी, तमिल, तेलगू, मल्यालम भाषेतील चित्रपट एकाचवेळी कसे करता, या प्रश्नावर तापसी म्हणाली, बॉलीवुडमध्ये सक्रिय झाल्यानंतरही वर्षातून किमान एक चित्रपट दक्षिण भारतीय केला पाहिजे, असा उद्देश आहे. गेल्या शुक्रवारी तिचा एक तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे.एखादा मराठी चित्रपट करणार काय या प्रश्नावर ती म्हणाली, जोपर्यंत मराठी भाषा चांगल्या प्रकारे बोलता येणार नाही, तोपर्यंत मराठी चित्रपट करणे शक्य नाही. तर मग तेलगू, तामिळ बोलता येते का, यावर तिने तेलगू बोलता येते, असे सांगितले. तामिळसुद्धा थोडेफार बोलता येते. लवकर लवकर तिचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत, यावर ज्युनिअर बच्चन म्हणाले, ऋृतू कमी येतात, पण तापसीचे चित्रपट जास्त प्रदर्शित होतात.वैयक्तिक कारणामुळे ‘पलटन’ चित्रपट केला नाहीअभिषेक बच्चन म्हणाले, वैयक्तिक कारणांमुळे ‘पलटन’ चित्रपट करता आला नाही. जेपी दत्ता यांच्या या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. पण वैयक्तिक कारणांमुळे चित्रपट करणे शक्य झाले नाही. जेपी दत्ता माझ्या परिवाराचा हिस्सा आहे. मला इंडस्ट्रीमध्ये त्यांनी लॉन्च केले आहे. १० वर्षांनंतर ते चित्रपट तयार करीत आहे. त्यांची मुलगी निधी निर्मिती करीत आहे. दत्ता हे वडिलांसारखे आहेत. त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे.प्रशंसा बरी वाटतेसंजू चित्रपटातून चर्चेत आलेले विक्की कौशल्य म्हणाला, संजू चित्रपटाची प्रत्येकाकडून प्रशंसा ऐकून बरे वाटते. दिग्दर्शक, निर्माते जेव्हा चांगल्या अभिनयाची प्रशंसा करतात तेव्हा आयुष्यात त्यापेक्षा दुसरी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. संजूच्या यशानंतर अनेक चित्रपटांच्या आॅफर येत आहेत.

बिग-बी आणि ज्युनियर बच्चन यांच्यात थोडासा फरकसिनीअर बच्चन आणि ज्युनियर बच्चन यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवावर तापसी म्हणाली, दोघांमध्ये थोडासा फरक आहे. त्याचवेळी ज्युनिअर बच्चन म्हणाले, माझी दाढी काळी तर त्यांची पांढरी आहे. तेव्हा तापसी म्हणाले, अनेकदा आवाज आणि अंदाज दोघांचेही सारखेच वाटतात. दोघांमध्ये फारसे अंतर नाही.फुटबॉल, कबड्डी आणि कॅमेरा यांच्यात कॅमेऱ्याचे जास्त आकर्षणफुटबॉल, कबड्डी आणि कॅमेरा यांच्यात कोणत्या गोष्टीचे आकर्षण आहे या प्रश्नावर ज्युनिअर बच्चन म्हणाले, कॅमेऱ्याचे सर्वाधिक आकर्षण आहे. प्रत्येक अभिनेत्यासाठी हे महत्त्वाचे आहे.मल्टीस्टार व सोलो चित्रपटाचा विचार करीत नाहीचित्रपटात काम करताना मल्टीस्टार वा सोलो चित्रपटाच्या बाबतीत विचार करीत नाही. चित्रपटात भूमिका दमदार असावी. भूमिका पाच मिनिटे असो वा दहा मिनिटे त्याचाही विचार करीत नाही. तसे पाहता प्रत्येक चित्रपटात अनेक कलाकार असतात. गुरू चित्रपटात माझ्यासोबत मिथुनदा, विद्या बालन, माधवन यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते, असे अभिषेक बच्चन म्हणाले.‘एफर्टलेस’ कलाकारविक्की कौशलची प्रशंसा करताना अभिषेक बच्चन म्हणाले, विक्की आणि तापसी ‘एफर्टलेस’ कलाकार आहेत. भूमिकेत ते पूर्णपणे फिट होतात. आलिया वा जान्हवी यांच्यापैकी कोणत्या अभिनेत्रीसोबत आॅनक्रीन रोमान्स करण्याची इच्छा आहे. यावर विक्की म्हणाला, आलिसासोबत आॅनस्क्रीन रोमान्स केला आहे. या बाबतीत निर्माते वा दिग्दर्शकासोबत काही बोलता येईल, अशी स्थिती आता माझी नाही.

टॅग्स :Abhishek Bacchanअभिषेक बच्चनbollywoodबॉलिवूड