शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नळाला नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:49 IST

महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनळाला अर्धा तास पाणी अन् करंगळीएवढी धारअर्धा ड्रम पाण्यात कसे घालवायचे २४ तास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.जवळपास संपूर्ण शहरात ओसीडब्ल्यू नळाद्वारे पाण्याचे वितरण करत असते. या सेवेसाठी नागरिकांना करही भरावा लागतो. मात्र, पाणी वितरणात कमालीची अनियमितता दिसून येत आहे. काही भागात दिवसातून तीनवेळा पाण्याचा पुरवठा केला जातो तर काही भागात एकही वेळ पाणी बरोबर पोहोचत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर एक दिवसाआड नळाला पाणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाठोडा, खरबी या भागात अशाच अनियमिततेचा फटका भर उन्हाळ्यात सामान्य नागरिकांना बसत आहे. उन्हाचा ताप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या काळात शासन-प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर तासाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे, दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे, बाहेरून येताच सर्व कपडे धुण्यास टाकणे असे आवाहन केले जात आहे. मात्र, पाणीच नसेल तर या आवाहनाला दुजोरा कसा द्यावा, हा प्रश्न नागरिकांपुढे आहे. वाठोडा, खरबी, रमणा मारोती परिसरात दिवसातून एक वेळ नळाला पाणी सोडले जाते. मात्र, नळाला येणाऱ्या पाण्याची धार करंगळीपेक्षाही बारीक असते. काही भागात हा पाणीपुरवठा एक तास तर काही भागात अर्धा तासच असतो. करंगळीएवढ्या धारेत धड अर्धा ड्रमही पाणी भरले जात नाही. शिवाय पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. अशा स्थितीत घरात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना केवळ पिण्यापुरतेच पाणी वापरावे लागत आहे. आंघोळ, कपडे धुणे तर फार लांबची गोष्ट. त्यात उन्हाळा तापत असल्याने कूलरलाही पाणी लागते. मात्र, या भागातील नागरिकांना दिवस व रात्र उष्णतेतच काढावे लागत असल्याचे चित्र आहे.गर्भवती स्त्रियांची होतेय आबाळया काळात ज्यांच्याकडे गर्भवती स्त्रिया आहेत किंवा बाळंतीण आहेत, त्यांची प्रचंड आबाळ होत आहे. बाळंतीण व नवजात अपत्य असलेल्या घरी सातत्याने कपडे धुणे, आंघोळ करणे अशा प्रक्रिया असतात. मात्र, पाणीच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.शहर पुन्हा टँकरयुक्त नागपूरच्या दिशेने!नळाला पाणी येत नसल्याने या भागातील नगरसेवकांकडे नागरिकांकडून टँकर्सची मागणी वाढली आहे. २४ बाय ७ ही योजना आकारताना शहर टँकरमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रस्तोरस्ती टँकरच्या फेºया वाढल्याचे दिसून येत आहे.तक्रार केली तरी काहीच फायदा नाहीनळाला पाणी नाही अशी तक्रार केल्यावर एक जण येतो व तपासणी करून जातो. दोन दिवस व्यवस्थित पाणी येते व नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. तक्रारीचा काहीच लाभ होत नसल्याची प्रतिक्रिया पुष्पा चर्लेवार यांनी दिली. तक्रार एका घरची नसते तर ती त्या परिसरातील असते. तरी येणारा एकाच घरी तपासून निघून जातो. ही समस्या कायमची सोडविण्याची गरज असल्याची भावना वनिता लिचडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर