शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नळाला नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:49 IST

महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनळाला अर्धा तास पाणी अन् करंगळीएवढी धारअर्धा ड्रम पाण्यात कसे घालवायचे २४ तास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.जवळपास संपूर्ण शहरात ओसीडब्ल्यू नळाद्वारे पाण्याचे वितरण करत असते. या सेवेसाठी नागरिकांना करही भरावा लागतो. मात्र, पाणी वितरणात कमालीची अनियमितता दिसून येत आहे. काही भागात दिवसातून तीनवेळा पाण्याचा पुरवठा केला जातो तर काही भागात एकही वेळ पाणी बरोबर पोहोचत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर एक दिवसाआड नळाला पाणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाठोडा, खरबी या भागात अशाच अनियमिततेचा फटका भर उन्हाळ्यात सामान्य नागरिकांना बसत आहे. उन्हाचा ताप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या काळात शासन-प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर तासाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे, दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे, बाहेरून येताच सर्व कपडे धुण्यास टाकणे असे आवाहन केले जात आहे. मात्र, पाणीच नसेल तर या आवाहनाला दुजोरा कसा द्यावा, हा प्रश्न नागरिकांपुढे आहे. वाठोडा, खरबी, रमणा मारोती परिसरात दिवसातून एक वेळ नळाला पाणी सोडले जाते. मात्र, नळाला येणाऱ्या पाण्याची धार करंगळीपेक्षाही बारीक असते. काही भागात हा पाणीपुरवठा एक तास तर काही भागात अर्धा तासच असतो. करंगळीएवढ्या धारेत धड अर्धा ड्रमही पाणी भरले जात नाही. शिवाय पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. अशा स्थितीत घरात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना केवळ पिण्यापुरतेच पाणी वापरावे लागत आहे. आंघोळ, कपडे धुणे तर फार लांबची गोष्ट. त्यात उन्हाळा तापत असल्याने कूलरलाही पाणी लागते. मात्र, या भागातील नागरिकांना दिवस व रात्र उष्णतेतच काढावे लागत असल्याचे चित्र आहे.गर्भवती स्त्रियांची होतेय आबाळया काळात ज्यांच्याकडे गर्भवती स्त्रिया आहेत किंवा बाळंतीण आहेत, त्यांची प्रचंड आबाळ होत आहे. बाळंतीण व नवजात अपत्य असलेल्या घरी सातत्याने कपडे धुणे, आंघोळ करणे अशा प्रक्रिया असतात. मात्र, पाणीच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.शहर पुन्हा टँकरयुक्त नागपूरच्या दिशेने!नळाला पाणी येत नसल्याने या भागातील नगरसेवकांकडे नागरिकांकडून टँकर्सची मागणी वाढली आहे. २४ बाय ७ ही योजना आकारताना शहर टँकरमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रस्तोरस्ती टँकरच्या फेºया वाढल्याचे दिसून येत आहे.तक्रार केली तरी काहीच फायदा नाहीनळाला पाणी नाही अशी तक्रार केल्यावर एक जण येतो व तपासणी करून जातो. दोन दिवस व्यवस्थित पाणी येते व नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. तक्रारीचा काहीच लाभ होत नसल्याची प्रतिक्रिया पुष्पा चर्लेवार यांनी दिली. तक्रार एका घरची नसते तर ती त्या परिसरातील असते. तरी येणारा एकाच घरी तपासून निघून जातो. ही समस्या कायमची सोडविण्याची गरज असल्याची भावना वनिता लिचडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर