शहरं
Join us  
Trending Stories
1
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
2
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
3
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
4
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
5
Gautam Gambhir: गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या नावावर 'या' ५ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
6
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार ही मराठी अभिनेत्री? तेलुगु सिनेमात केलंय काम, प्रोमोमुळे चर्चेला उधाण
7
आता Apple नं घेतला कर्मचारी कपातीचा मोठा निर्णय; 'या' ५ कारणांमुळे कंपनीनं केली घोषणा
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
9
Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!
10
Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?
11
"माझं काळीज तुटलंय...", स्मशानभूमीबाहेर धाय मोकलून रडली धर्मेंद्र यांची चाहती, काळजाला चर्रर्र करणारा व्हिडीओ
12
चीनमध्ये अरुणाचल प्रदेशातील महिलेसोबत असभ्य वर्तन, आता भारतानेही दिले सडेतोड प्रत्युत्तर
13
जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत मोठा फेरबदल! लॅरी पेज दुसऱ्या क्रमांकावर; 'ही' व्यक्ती टॉप-१० मधून बाहेर!
14
Pakistan attack Afghanistan: पाकिस्तानी लष्कराचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, लहान मुलांसह १० जणांचा मृत्यू
15
"वनडेतून निवृत्ती घेऊन त्याने कसोटीत खेळायला हवं होतं"; किंग कोहलीच्या सहकाऱ्याची पोस्ट व्हायरल
16
PM Modi: ११ फूट रुंद, २२ फूट लांब, १९१ फूट उंच; पंतप्रधान मोदी राम मंदिराच्या शिखरावर फडकवणार भगवा ध्वज!
17
विवाह पंचमी २०२५: विवाह पंचमीला रामसीतेचा विवाह, पण इतरांसाठी ही विवाहतिथी निषिद्ध का?
18
"त्यांचं अचूक टायमिंग..", धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा 'इक्कीस'; सुहासिनी मुळेंनी सांगितली आठवण
19
Post Office ची जबरदस्त स्कीम, दर महिन्याला छोटी रक्कम जमा करा; ५ वर्षात बनेल १४ लाखांचा फंड
20
मोहम्मद पैगंबरांच्या केसासाठी १० लाखांचे दागिने गमावले, माहीममधील कुटुंबाची भामट्याकडून फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

नळाला नाही पाणी, घागर उताणी रे गोपाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:49 IST

महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनळाला अर्धा तास पाणी अन् करंगळीएवढी धारअर्धा ड्रम पाण्यात कसे घालवायचे २४ तास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका व ओसीडब्ल्यूने २४ बाय ७ पाणी वितरण योजनेंतर्गत नागरिकांची पाण्याची समस्या आता संपली असे जाहीर केले असले तरी वारंवार या यंत्रणेत त्रुटी आढळून येत आहेत. त्याचा फटका प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या व पाण्याचा अपव्यय टाळणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाळा तीव्र झाला आहे आणि कोरोनाच्या काळात शासन वारंवार हात धुण्यास व आंघोळ करण्यास सांगत आहे. मात्र, ‘नळाला नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा..’ अशी आळवणी नागरिकांना करावी लागत असल्याचे चित्र आहे.जवळपास संपूर्ण शहरात ओसीडब्ल्यू नळाद्वारे पाण्याचे वितरण करत असते. या सेवेसाठी नागरिकांना करही भरावा लागतो. मात्र, पाणी वितरणात कमालीची अनियमितता दिसून येत आहे. काही भागात दिवसातून तीनवेळा पाण्याचा पुरवठा केला जातो तर काही भागात एकही वेळ पाणी बरोबर पोहोचत नसल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर एक दिवसाआड नळाला पाणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाठोडा, खरबी या भागात अशाच अनियमिततेचा फटका भर उन्हाळ्यात सामान्य नागरिकांना बसत आहे. उन्हाचा ताप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात कोरोनाच्या काळात शासन-प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दर तासाने २० सेकंदांपर्यंत हात धुणे, दिवसातून दोन वेळा आंघोळ करणे, बाहेरून येताच सर्व कपडे धुण्यास टाकणे असे आवाहन केले जात आहे. मात्र, पाणीच नसेल तर या आवाहनाला दुजोरा कसा द्यावा, हा प्रश्न नागरिकांपुढे आहे. वाठोडा, खरबी, रमणा मारोती परिसरात दिवसातून एक वेळ नळाला पाणी सोडले जाते. मात्र, नळाला येणाऱ्या पाण्याची धार करंगळीपेक्षाही बारीक असते. काही भागात हा पाणीपुरवठा एक तास तर काही भागात अर्धा तासच असतो. करंगळीएवढ्या धारेत धड अर्धा ड्रमही पाणी भरले जात नाही. शिवाय पाण्याचा दुसरा स्त्रोत नाही. अशा स्थितीत घरात असलेल्या कुटुंबातील सदस्यांना केवळ पिण्यापुरतेच पाणी वापरावे लागत आहे. आंघोळ, कपडे धुणे तर फार लांबची गोष्ट. त्यात उन्हाळा तापत असल्याने कूलरलाही पाणी लागते. मात्र, या भागातील नागरिकांना दिवस व रात्र उष्णतेतच काढावे लागत असल्याचे चित्र आहे.गर्भवती स्त्रियांची होतेय आबाळया काळात ज्यांच्याकडे गर्भवती स्त्रिया आहेत किंवा बाळंतीण आहेत, त्यांची प्रचंड आबाळ होत आहे. बाळंतीण व नवजात अपत्य असलेल्या घरी सातत्याने कपडे धुणे, आंघोळ करणे अशा प्रक्रिया असतात. मात्र, पाणीच नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.शहर पुन्हा टँकरयुक्त नागपूरच्या दिशेने!नळाला पाणी येत नसल्याने या भागातील नगरसेवकांकडे नागरिकांकडून टँकर्सची मागणी वाढली आहे. २४ बाय ७ ही योजना आकारताना शहर टँकरमुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा रस्तोरस्ती टँकरच्या फेºया वाढल्याचे दिसून येत आहे.तक्रार केली तरी काहीच फायदा नाहीनळाला पाणी नाही अशी तक्रार केल्यावर एक जण येतो व तपासणी करून जातो. दोन दिवस व्यवस्थित पाणी येते व नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते. तक्रारीचा काहीच लाभ होत नसल्याची प्रतिक्रिया पुष्पा चर्लेवार यांनी दिली. तक्रार एका घरची नसते तर ती त्या परिसरातील असते. तरी येणारा एकाच घरी तपासून निघून जातो. ही समस्या कायमची सोडविण्याची गरज असल्याची भावना वनिता लिचडे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर