शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसचा कीडा नाही ‘लारव्हा’ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:21 IST

स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देउंदरांवर ठेवा अंकुश : जि.प.च्या आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.जि.प.चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या अध्यक्षतेत आरोग्य समितीची बैठक पार पडली. बैठकीत सदस्यांनी स्क्रब टायफसच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती केली. यावेळी डॉ. सवई म्हणाले की, स्क्रब टायफसला झाडेझुडपे आणि उंदीर हे जबाबदार आहे. स्क्रब टायफसचा कीडा लारव्हा झाडेझुडपाला चिटकून राहतो. मानव या लारव्हाच्या संपर्कात आल्यास तो आजाराला बळी पडतो. कीडा चावल्याने स्क्रब टायफस होत नाही तर लारव्हा हा घातक असतो. उंदरामुळे हा आजार शहरात पसरत आहे. उंदीर हे झाडाझुडपातून फिरत असताना त्यांच्या शरीरावर हा लारव्हा बसतो. घरामध्ये उंदरांमुळे हा आजार पसरतो. डॉ. सवई यांनी ज्या रुग्णांना स्क्रब टायफस झाला आहे त्या रुग्णांच्या घराचे सर्वेक्षण केले असता, या बाबी आढळून आल्याचे ते म्हणाले.- जिल्ह्यात २१ रुग्ण, ५ मृत्यूनगरपालिकेच्या क्षेत्रात या आजाराचे ९ व ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळले आहेत. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच स्क्रब टायफसचे लक्षण आढळल्यास पॅरासिटॉमॉल टॅब्लेट, डॉक्सिसायक्लीन व अ‍ॅझीथ्रोमायसीन हे औषध घ्यावे. सर्व ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध उपलब्ध आहे.- ग्रा.पं. व नगरपालिकेने करावी उपाययोजना२ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान स्वच्छ भारत अभियान गावागावात राबवायचे आहे. डेंग्यू, स्क्रब टायफस यासारख्या आजाराचा होत असलेला उद्रेक लक्षात घेता, ग्रा.पं.ने त्यांच्या हद्दीतील झाडेझुडपे तणनाशकाने नष्ट करावे. गटार, कचºयाचे उकीरडे, शेणाच्या उकीरड्यावर मॅलिथियम पाडवर टाकावे. नागरिकांनी घरातील व परिसरातील उंदरांची बिळे नष्ट करावीत. यासंदर्भातील उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व ग्रा.पं., नगरपालिकांना सीईओंनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे आजाराचे उद्रेक लक्षात घेता गावकºयांच्या आरोग्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी केले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य