शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पदांची कपात नाही, पगारवाढ देणार : ऊर्जामंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 20:37 IST

वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत, गैरसमज असतील तर दूर केले जातील मात्र काळानुसार बदल हा अपेक्षितच आहे. त्यामध्ये काही सुधार असल्यास संघटनेने व्यवस्थापनास कळवावे. तिन्ही वीज कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. वीज हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी आणणे गरजेचे आहे. वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांची पगारवाढ विधानसभा निवडणुकीपूर्वी केली जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ठळक मुद्देम.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत, गैरसमज असतील तर दूर केले जातील मात्र काळानुसार बदल हा अपेक्षितच आहे. त्यामध्ये काही सुधार असल्यास संघटनेने व्यवस्थापनास कळवावे. तिन्ही वीज कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. वीज हानी १५ टक्क्यांपेक्षा कमी आणणे गरजेचे आहे. वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांची पगारवाढ विधानसभा निवडणुकीपूर्वी केली जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.महाराष्ट्र राज्य वीज मंडळ अधिकारी संघटनेच्या ४२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे शनिवारी आमदार निवास येथे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर दिलीप घुगल, प्रभारी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) महापारेषण सुगत गमरे, मुख्य अभियंता कोराडी वीज केंद्र अभय हरणे, मुख्य अभियंता पारेषण(नागपूर परिमंडळ) सुरेश पाटील, म.रा.वि.मं.अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सतीश तळणीकर, सरचिटनिस दिलीप शिंदे, संघटन सचिव प्रवीण बागुल प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.२१ व्या शतकात वीज क्षेत्रासमोर प्रचंड आव्हाने आहेत. अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत निर्माण करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा उभारणे, सुमारे १०००० मेगावाट क्षमतेचे महापारेषणचे जाळे उभारणे, महावितरणच्या ३५ वर्षे जुन्या नेटवर्कला सुदृढ करणे, अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणे, कृषी क्षेत्र सौर ऊर्जेवर आणणे. महानिर्मितीच्या जुन्या संचाऐवजी अत्याधुनिक संच उभारणे, कमी खर्चात वीज उत्पादन करणे, राज्य भारप्रेषण केंद्र (एस.एल.डी.सी.) स्काडा सिस्टीम रियल टाइम डाटा उपलब्ध करून संचालन व्यवस्था अधिक मजबूत करणे इत्यादी प्रमुख आव्हाने वीज क्षेत्रासमोर असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.संघटनेचे सरचिटणीस दिलीप शिंदे यांनी भरती, बदली, बढती विषयाला हात घालत पुनर्रचनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पदे कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. वरिष्ठ व्यवस्थापक(मानव संसाधन) यांना वरिष्ठ व्यवस्थापक(वित्त व लेखा) समकक्ष वेतनश्रेणी मिळावी , जनसंपर्क संवर्गाचे अपग्रेडेशन, स्टेट्स व मनुष्यबळ, औद्योगिक संबंध संवर्ग, माहिती तंत्रज्ञान संवर्ग, विधी संवर्ग व सुरक्षा संवर्गाच्या अधिकाऱ्यांना, न्याय देण्याच्या दृष्टीने अधिकारी संघटनेने प्रस्ताव दिला असल्याचे त्यांनी सांगितले. अंतर्गत अधिसूचनेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, तिन्ही वीज कंपन्यांमध्ये समान वेतन संरचना असावी, शिक्षेबाबतचे अधिकार विभाग प्रमुखाला बहाल करण्यात यावे तसेच वेतनवाढ २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात यावी, अशा मागण्या त्यांनी मांडल्या.

टॅग्स :electricityवीजEmployeeकर्मचारी