शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

नको ऑनलाईन ‘लेसन’, पोटासाठी हवे ‘रेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 20:24 IST

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांकडून संताप व्यक्त होत असून ‘ऑनलाईन लेसन नको तर पोटासाठी रेशन द्या’ अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून होत आहे.

ठळक मुद्दे‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांकरिता सुरू करण्यात आलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण भागातील पालकांकडून संताप व्यक्त होत असून ‘ऑनलाईन लेसन नको तर पोटासाठी रेशन द्या’ अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून होत आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे संपूर्ण जीवनमान विस्कळीत झाले आहे. लोकांचा रोजगार बंद आहे. त्यामुळे खरं तर लोकांची कुटुंबाच्या उदरनिवार्हासाठी धडपड सुरू आहे. लॉकडाऊनमुळे कुठलेही अर्थार्जन नाही. घरातील धान्य संपले आहे. रेशनच्या दुकानात अथवा सेवाभावी संस्थांकडून वितरित करण्यात येत असलेल्या धान्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. एकूणच काय तर लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ग्रामीण भागातील जीवनाचे असे विदारक चित्र असताना दुसरीकडे मात्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाचा अट्टाहास सुरू आहे. विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यास देणे, त्यावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवून घेणे आदी बाबी करून घेतल्या जात आहे. हे सर्व कमी की काय म्हणून रेडिओवरचे कार्यक्रम ऐकण्याबाबतही विद्यार्थ्यांना सक्ती केल्या जात आहे. सुरूवातीला या उपक्रमाबाबत आढावा घेतल्या जात नव्हता परंतु आता त्याबाबतचा आढावा घेणे सुरू झाल्याने शिक्षकही पालकांना वारंवार फोन करून विद्यार्थ्यांबाबत माहिती जाणून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण पालक अधिकच त्रस्त होत असून गुरुजी, आम्हाला जगू द्या, सध्या आमच्यासाठी तेच महत्त्वाचे आहे. आज जगलो तर उद्या शिकता येईल. आणि आमच्या लेकरांचा एवढाच कळवळा असेल तर या तुमच्या ऑनलाईन लेसनऐवजी त्याच्यासाठी थोडे रेशन पाठवायला सांगा तुमच्या सरकारला, असा संताप व्यक्त करीत आहेत. एकूणच ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमाबाबत ग्रामीण पालकांमध्ये प्रचंड चीड आहे. त्याबाबतचा संताप ते शिक्षकांकडे व्यक्त करीत आहेत. काही ठिकाणी यावरून शिक्षक व पालकात वाक्युद्ध रंगल्याचेही उदाहरणं पाहायला मिळत आहेत. हे थांबले नाही तर या उपक्रमावरून शिक्षक व पालकात संघर्ष निर्माण होण्याची संभावना नाकारता येत नाही.या उपक्रमाची सक्ती करू नयेलॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद आहे. लोकांचा रोजगार हिरावल्या गेला आहे. हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न लोकांपुढे आहे. खऱ्या अर्थाने लोकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. असे असताना लर्न फ्रॉम होम सारखे उपक्रम लादणे योग्य नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाची सक्ती करण्यात येऊ नये, अशी भावना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Educationशिक्षणonlineऑनलाइन