शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 07:34 IST

मध्य नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा मध्य नागपुरातील ‘रोड शो’ बडकस चौकात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी यांना झेंडे दाखविले.

नागपूर : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना संघ मुख्यालयाजवळील चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखविले. प्रत्युत्तरात प्रियांका गांधी यांनी झेंडे दाखविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काहीही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार, असे वक्तव्यही झेंडे दाखविणाऱ्यांना उद्देशून त्यांनी केले. बडकस चौकात हा प्रकार घडला.  

मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. सायंकाळी ५:४० च्या सुमारास रॅली बडकस चौकात आली. येथील एका मिष्टान्न भांडारच्या इमारतीवर भाजपचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी प्रियांका यांना भाजपचे झेंडे दाखविले. ते पाहून त्यांनी त्यांना नमस्कार केला. तसेच माईक हातात घेऊन ‘झेंडे दाखविणाऱ्या  कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, काही केले तरी येथे मविआचाच  उमेदवार निवडून येणार,’ असे  वक्तव्य त्यांनी केले. 

दुसरीकडे उजव्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन पुढे जात होते. त्यांनी तिथेच थांबून घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने  येथे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कार्यकर्ते जुमानत नसल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटण्यास सुरुवात केली. दरम्यान, १५ मिनिटांनंतर वातावरण शांत झाले. 

बहिणींनो, तुम्ही देश बदलवू शकता, सत्ता बदला

देसाईगंज (जि. गडचिरोली) : बहिणींनो, ही निवडणूक तुमच्या मुद्यांवर, तुमच्या समस्यांवर लढली जायला हवी. पाणी, वीज, महागाई, बेरोजगारी या तुमच्या समस्या आहेत. तुम्ही या देशाची जनता आहात आणि तुमचा विकास होतोय की नाही, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणींनो, तुम्ही या देशाची शक्ती आहात. स्वत:ला कमजोर समजू नका. स्वत:ची शक्ती ओळखा. तुम्ही देश बदलवू शकता. सत्ता बदला, अशी भावनिक साद काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी घातली.

आम्ही बोलायला गेलो तर त्यांना भिवापुरी मिरची झोंबते!

उमरेड : पैशाच्या भरवशावर वाट्टेल ते केले. या सरकारने १६ लाख कोटी रुपये श्रीमंतांचे माफ केले. शेतकऱ्यांवर अन्याय केला, अशा शब्दांत तोफ डागत आम्ही बोलायला गेलो तर भिवापुरी मिरची झोंबते असा प्रहार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर केला.

उमरेड, सांगली येथे खरगे यांनी रविवारी प्रचारसभा घेतल्या. लोकसभेत जनतेने धडा शिकवला. आता त्यांच्या सरकारला सत्तेत राहण्यासाठी बिहारचे नितीशकुमार आणि आंध्रचे चंद्राबाबू नायडू हे टेकू हवे आहेत. या दोघांनी माघार घेतली तर सरकार कोसळेल. ही कमाल महाराष्ट्राने केल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpur-central-acनागपूर मध्यPriyanka Gandhiप्रियंका गांधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी