शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

जादूमंतर नाहीच : छूमंतर झालेल्या बस थांब्यांचे रहस्य अखेर उलगडले, उलटसुलट चर्चेला उधाण

By नरेश डोंगरे | Updated: June 23, 2024 20:33 IST

महापालिकेचा गजब कारभार, २३० बस थांबे बांधले अन् काढूनही टाकले

नरेश डोंगरे - नागपूर : कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेच्या परिवहन विभागाने शहरात गेल्या तीन वर्षात २३० बस थांबे बांधले. विशेष म्हणजे, हे सर्वच्या सर्व बस थांबे महापालिकेने काढूनही टाकले. परिवहन विभागाकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती उपलब्ध झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या नागपूर शहरात महापालिकेकडून शहर बससेवेचे (ऑपरेटरच्या माध्यमातून) संचालन केले जाते. शहराच्या विविध भागातील प्रवाशांना या बस सेवेचा माफक दरात लाभ मिळतो. त्यामुळे रोज हजारो प्रवासी या बसची वाट वेगवेगळ्या भागात पहात असतात. उन, वारा, पाऊस यापासून नागरिकांचे संरक्षण व्हावे म्हणून महापालिकेच्या परिवहन विभागाने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध भागात बस थांबे बांधले आहेत. मात्र, शहरात काल-परवापर्यंत दिसणारे बस थांबे एक एक करून हळूहळू गायब होत असल्याचे प्रकार घडत आहेत.

चांगले लोखंडी साहित्य वापरून बांधण्यात आलेले आणि वरकरणी मजबूत दिसणारे हे बस थांबे कुणी चोरून नेले, की हवेमुळे उडून गेले, की कुणी छुमंतर करून बस थांबे गायब केले, असे प्रश्न स्वाभाविकपणे नागरिकांना पडत होते. त्या संबंधाने सर्वत्र चर्चा होत आहे. कुणाकडून तक्रार तर कुणाकडून विचारणाही केली जात आहे. महापालिकेच्या परिवहन विभागाकडे या संबंधाने माहितीच्या अधिकारात विचारणा केली असता धक्कादायक माहिती उघड झाली.

प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२१ ते २० मे २०२४ या कालावधीत महापालिकेच्या परिवहन विभागाकडून २३० बस थांबे (शेड) बांधून घेण्यात आले. मात्र, त्याचा उपयोग होत नसल्यामुळे ते सर्वच्या सर्व २३० थांबे काढूनही टाकण्यात आले आहे.हा बस थांब्याचा घोटाळा का ?अधिकृतपणे उपलब्ध झालेल्या या माहितीमुळे विविध प्रश्न चर्चेला आले आहे. संबंधित ठिकाणी बस थांबे बांधण्याची आवश्यकता महापालिकेला कुणी लक्षात आणून दिली होती आणि कोट्यवधींचा खर्च करून तीन वर्षांत बांधण्यात आलेल्या या २३० पैकी एकाही थांब्याचा उपयोग होत नसल्याचा अविष्कार महापालिकेच्या परिवहन विभागाला कसा झाला, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, बांधण्यात अलेल्या बस थांब्यांना काढून टाकण्यासाठी किती रुपयांचा खर्च करण्यात आला, असाही प्रश्न असून बस थांबे बांधण्याचा, काढून टाकण्याचा कोट्यवधींचा हा घोटाळा तर नाही ना, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर