शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:00 IST

Nagpur News वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

 

सुमेध वाघमारे

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. टायर्स सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी नुकतेच परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील वाहनांचा कसून तपासणीसोबतच दोषी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

-पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के

सुरक्षित प्रवासासाठी टायर्स योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. वेळोवेळी टायर तपासणे आणि इतर भागांइतकीच टायर्सची सुद्धा योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. परंतु बहुसंख्य वाहन चालक त्याकडेच दुर्लक्ष करीत असल्याने हे टायर्सच अपघाताला मुख्य कारण ठरतात. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत टायर पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर टायर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.

-२२ प्राणांतिक अपघातात ३६ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत २२ प्राणांतिक अपघात झाले. त्यात ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या खूप मोठी असल्याने आरटीओने कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

-एकाच दिवशी सहा वाहनांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने गुरुवारी समृद्धी महागार्मावरील वाहनांची तपासणी करून दोषी सहा वाहनांवर कारवाई केली. यात चुकीच्या लेनवर धावणाऱ्या ‘एमएच ११ बीएल ४१०७’, ‘एमएच २७ ए ९९२७’ व ‘एचआर ३८ एडी ४८३९’ या क्रमांकाच्या वाहनांवर तर, योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या ‘एमएच २७ बीझेड ५००४’, ‘डीएल ९ सीएयू ८३८९’ व ‘एमएच ३० एझेड १६५२’ या वाहनांना प्रवेश रोखून मोटार वाहन कायद्यानुसार जवळपास प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला.

-गुळगुळीत टायर्समुळे अपघाताचा धोका अधिक

टायर्सना एक आयुष्य असते. त्यानंतर ते खराब होतात किंवा वापरण्यालायक राहात नाहीत. टायर्स गुळगुळीत झाले असल्यास अपघाताचा धोका कित्येक पटीने वाढतो. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वायुवेग पथकाकडून तपासणी केली जात आहे. यात वाहनाचा फिटनेससोबतच टायर्सकडे विशेष लक्ष दिले जात आहे. योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश रोखला जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग