शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:00 IST

Nagpur News वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

 

सुमेध वाघमारे

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. टायर्स सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी नुकतेच परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील वाहनांचा कसून तपासणीसोबतच दोषी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

-पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के

सुरक्षित प्रवासासाठी टायर्स योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. वेळोवेळी टायर तपासणे आणि इतर भागांइतकीच टायर्सची सुद्धा योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. परंतु बहुसंख्य वाहन चालक त्याकडेच दुर्लक्ष करीत असल्याने हे टायर्सच अपघाताला मुख्य कारण ठरतात. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत टायर पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर टायर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.

-२२ प्राणांतिक अपघातात ३६ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत २२ प्राणांतिक अपघात झाले. त्यात ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या खूप मोठी असल्याने आरटीओने कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

-एकाच दिवशी सहा वाहनांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने गुरुवारी समृद्धी महागार्मावरील वाहनांची तपासणी करून दोषी सहा वाहनांवर कारवाई केली. यात चुकीच्या लेनवर धावणाऱ्या ‘एमएच ११ बीएल ४१०७’, ‘एमएच २७ ए ९९२७’ व ‘एचआर ३८ एडी ४८३९’ या क्रमांकाच्या वाहनांवर तर, योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या ‘एमएच २७ बीझेड ५००४’, ‘डीएल ९ सीएयू ८३८९’ व ‘एमएच ३० एझेड १६५२’ या वाहनांना प्रवेश रोखून मोटार वाहन कायद्यानुसार जवळपास प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला.

-गुळगुळीत टायर्समुळे अपघाताचा धोका अधिक

टायर्सना एक आयुष्य असते. त्यानंतर ते खराब होतात किंवा वापरण्यालायक राहात नाहीत. टायर्स गुळगुळीत झाले असल्यास अपघाताचा धोका कित्येक पटीने वाढतो. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वायुवेग पथकाकडून तपासणी केली जात आहे. यात वाहनाचा फिटनेससोबतच टायर्सकडे विशेष लक्ष दिले जात आहे. योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश रोखला जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग