शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:00 IST

Nagpur News वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

 

सुमेध वाघमारे

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. टायर्स सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी नुकतेच परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील वाहनांचा कसून तपासणीसोबतच दोषी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

-पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के

सुरक्षित प्रवासासाठी टायर्स योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. वेळोवेळी टायर तपासणे आणि इतर भागांइतकीच टायर्सची सुद्धा योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. परंतु बहुसंख्य वाहन चालक त्याकडेच दुर्लक्ष करीत असल्याने हे टायर्सच अपघाताला मुख्य कारण ठरतात. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत टायर पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर टायर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.

-२२ प्राणांतिक अपघातात ३६ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत २२ प्राणांतिक अपघात झाले. त्यात ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या खूप मोठी असल्याने आरटीओने कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

-एकाच दिवशी सहा वाहनांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने गुरुवारी समृद्धी महागार्मावरील वाहनांची तपासणी करून दोषी सहा वाहनांवर कारवाई केली. यात चुकीच्या लेनवर धावणाऱ्या ‘एमएच ११ बीएल ४१०७’, ‘एमएच २७ ए ९९२७’ व ‘एचआर ३८ एडी ४८३९’ या क्रमांकाच्या वाहनांवर तर, योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या ‘एमएच २७ बीझेड ५००४’, ‘डीएल ९ सीएयू ८३८९’ व ‘एमएच ३० एझेड १६५२’ या वाहनांना प्रवेश रोखून मोटार वाहन कायद्यानुसार जवळपास प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला.

-गुळगुळीत टायर्समुळे अपघाताचा धोका अधिक

टायर्सना एक आयुष्य असते. त्यानंतर ते खराब होतात किंवा वापरण्यालायक राहात नाहीत. टायर्स गुळगुळीत झाले असल्यास अपघाताचा धोका कित्येक पटीने वाढतो. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वायुवेग पथकाकडून तपासणी केली जात आहे. यात वाहनाचा फिटनेससोबतच टायर्सकडे विशेष लक्ष दिले जात आहे. योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश रोखला जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग