शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

टायर योग्य स्थितीत नाहीत तर, समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 08:00 IST

Nagpur News वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

 

सुमेध वाघमारे

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अनेक अपघातांचे मुख्य कारण म्हणजे टायर फुटणे किंवा टायरशी संबंधित समस्या आहेत. टायर्स सुरक्षित प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे नागपूर ग्रामीण आरटीओने टायर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. वाहनाचे टायर्स योग्य स्थितीत नसल्यास समृद्धी महामार्गावर ‘नो एन्ट्री’ची कठोर पावले उचलेली आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी अशा वाहनांचा प्रवेश रोखण्यासोबतच मोटार वाहन कायद्यानुसार २० हजार रुपयांपर्यंत दंडही आकारला.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे व उपाययोजनांसाठी नुकतेच परिवहन उपायुक्त (रस्ता सुरक्षा) भरत कळसकर यांनी शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाची पाहणी केली. पाहणीनंतर आरटीओ अधिकारी आणि ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील वाहनांचा कसून तपासणीसोबतच दोषी वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

-पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के

सुरक्षित प्रवासासाठी टायर्स योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. वेळोवेळी टायर तपासणे आणि इतर भागांइतकीच टायर्सची सुद्धा योग्य काळजी घेणे महत्त्वाचे असते. परंतु बहुसंख्य वाहन चालक त्याकडेच दुर्लक्ष करीत असल्याने हे टायर्सच अपघाताला मुख्य कारण ठरतात. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत टायर पंक्चरचे प्रमाण १५ टक्के, तर टायर फुटण्याचे प्रमाण १२ टक्के आहे.

-२२ प्राणांतिक अपघातात ३६ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत २२ प्राणांतिक अपघात झाले. त्यात ३६ जणांना आपला जीव गमवावा लागला. ही संख्या खूप मोठी असल्याने आरटीओने कठोर कारवाईची भूमिका घेतल्याचे बोलले जाते.

-एकाच दिवशी सहा वाहनांवर कारवाई

आरटीओच्या वायुवेग पथकाने गुरुवारी समृद्धी महागार्मावरील वाहनांची तपासणी करून दोषी सहा वाहनांवर कारवाई केली. यात चुकीच्या लेनवर धावणाऱ्या ‘एमएच ११ बीएल ४१०७’, ‘एमएच २७ ए ९९२७’ व ‘एचआर ३८ एडी ४८३९’ या क्रमांकाच्या वाहनांवर तर, योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या ‘एमएच २७ बीझेड ५००४’, ‘डीएल ९ सीएयू ८३८९’ व ‘एमएच ३० एझेड १६५२’ या वाहनांना प्रवेश रोखून मोटार वाहन कायद्यानुसार जवळपास प्रत्येकी २० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला.

-गुळगुळीत टायर्समुळे अपघाताचा धोका अधिक

टायर्सना एक आयुष्य असते. त्यानंतर ते खराब होतात किंवा वापरण्यालायक राहात नाहीत. टायर्स गुळगुळीत झाले असल्यास अपघाताचा धोका कित्येक पटीने वाढतो. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वायुवेग पथकाकडून तपासणी केली जात आहे. यात वाहनाचा फिटनेससोबतच टायर्सकडे विशेष लक्ष दिले जात आहे. योग्य स्थितीत टायर्स नसलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश रोखला जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग