शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तर मनपा मृत जलसाठा वापरणार : राज्य सरकारची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:36 IST

नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार करता प्रकल्पातील मृत साठा वापरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देनागपूरकरांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पेंच आणि कन्हान नदी प्रकल्पात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. १० जूनपर्यंत पुरेल इतकेच पाणी आहे. जून महिन्यात वेळेवर पाऊस न आल्यास शहरातील नागरिकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. याचा विचार करता प्रकल्पातील मृत साठा वापरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.प्रकल्पातील जिवंत साठा संपल्यानंतर मृत साठा वापरण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी महापालिकेने राज्य सरकारला पत्र पाठविले होते. यासंदर्भात महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मृत साठा वापरण्याची परवानगी देण्याबाबत विनंती केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृत जलसाठा वापरण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती महापौरांनी दिली. शहराला पाणीपुरवठा होणाºया नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्पात जेमतेम ४४.४३९ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी प्रति दिन १.३० दलघमी पाण्याचा वापर सुरू आहे. अर्थात उपलब्ध साठा हा १० जूनपर्यंतच पुरेल इतका आहे. सोमवारी नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प आणि कामठी नजीकच्या कन्हान नदी प्रकल्पाला भेट देऊ न पाणीसाठ्याची माहिती घेतली. मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्याला मंजुरी देण्याची मागणी केली.चौराई प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणीमध्य प्रदेशातील चौराई धरणात पाणी अडविल्याने गेल्या पावसाळ्यात पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारशी संपर्क साधून चौराई धरणातून पेंच प्रकल्पात पाणी सोडावे, अशी विनंतीही महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.५० कोटी खर्चून जलवाहिनी टाकणारसिंचन विभागातर्फे पेंच प्रकल्पातून सुमारे ७५ क्यूसेक्स पाणी कन्हान पाणी पुरवठा केंद्राला देण्यात येते. मात्र कालव्याव्दारे पाणी सोडले जात असल्याने पाणीपुरवठा केंद्रापर्यंत तेवढे पाणी येत नाही. याचा विचार करता पाईपलाईनने पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. यासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी जलप्रदाय विभागाला दिले. वेळोवेळी वीज जात असल्यामुळेही पाणी पुरवठ्यात मोठा अडसर निर्माण होतो. यासाठी आता ११ के.व्ही . क्षमतेच्या नवीन एक्स्प्रेस फीडरचा प्रस्तावही तयार करण्यात आल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाChief Ministerमुख्यमंत्रीwater shortageपाणीटंचाई