शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मनपा कचऱ्यापासून बनविणार 'सीएनजी' व 'ग्रीन हायड्रोजन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 10:48 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सुरुवात केली तर कचऱ्याच्या प्रक्रियेची समस्या दूर होईल. शिवाय स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरला याचा फायदा होईल, असे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले आहेत.

ठळक मुद्देहजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची डच कंपनीची तयारी स्वच्छतेत रँकिंग सुधारणार

नागपूर : नागपूर शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्यापासून सीएनजी(CNG) व ग्रीन हायड्रोजन(Green Hydrogen) बनविण्याचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. कचऱ्यापासून सीएनजी बनविण्यासाठी एका डच कंपनीने तसेच ग्रीन हायड्रोजनसाठी चेन्नई मनपामध्ये कार्यरत असलेल्या कंपनीने इच्छा दर्शविली आहे. संबंधित उपक्रमाचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी मांडल्या जाईल, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

संबंधित डच कंपनी २५ हेक्टर जमीन खरेदी करून कचऱ्यापासून सीएनजी बनविण्याचा प्रकल्प स्थापन करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव त्यांनी सादर केला आहे. शहरात दररोज बाराशे मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यातील हजार मेट्रिक टन कचरा कंपनीला देण्यात येईल. शिवाय सीएनजीतून मिळणाऱ्या लाभातून काही महसूल कंपनी मनपाला देईल. दुसरीकडे चेन्नईतील कंपनीला दोन एकर जमीन मनपा उपलब्ध करून देईल. त्यांना ५० मेट्रिक टन कचरा द्यावा लागेल. त्यातून ते ग्रीन हायड्रोजन निर्माण करतील.

कंपनीजवळ ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे उपकरणदेखील आहे. दोन्ही कंपन्यांच्या प्रस्तावांना नीरीकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहे. नीरीने हा प्रकल्प चांगला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच मनपा संबंधित प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. जर दोन्ही कंपन्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करून सीएनजी व ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची सुरुवात केली तर कचऱ्याच्या प्रक्रियेची समस्या दूर होईल. शिवाय स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरला याचा फायदा होईल, असा दावा महापौरांनी केला.

वायू-ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी नीरीची मदत

शहरातील स्मशानघाटांना पर्यावरणपूरक बनविण्यासाठीदेखील नीरीचे सहकार्य घेतले जात आहे. शिवाय वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी रस्ता दुभाजकांवर काही विशिष्ट जातीची झाडे लावण्याची प्रक्रिया नीरीच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे. नीरीचे वैज्ञानिक लाल सिंह यात सहकार्य करत आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली.

समाधानी आहे, पण संतुष्ट नाही

महापौरपदाची जबाबदारी स्वीकारून महापौरांना एक वर्ष झाले आहे. या वर्षातील साडे पाच महिने कोरोना व दीड महिना विधान परिषदेच्या आचारसंहितेत गेला. यादरम्यान सार्वजनिक सुट्यादेखील होत्या. जो वेळ मिळाला त्यात जे काम केले त्याने संतुष्ट नाही, पण समाधानी आहे, असे महापौरांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentपर्यावरणGarbage Disposal Issueकचरा प्रश्न