शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:05 IST

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा किस्सा सांगितला.

Nitin Gadkari ( Marathi News ) : काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात वनखात्याच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा एक किस्सा सांगितला.गडकरी काल एका कार्यक्रमात बोलत होते, यावेळी त्यांनी सरकारमध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगितले.यावेळी गडकरी यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सरकार काळातील एक किस्सा सांगितला. 

नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि राज्यपाल अलेक्झांडर होते. त्यावेळी मी राजदूत गाडीवरुन मेळघाटातील गावांमध्ये फिरत होतो. तिथल्या रस्त्यांची अवस्था खराब होती. तरीही वनखात्याचे अधिकारी रस्त्याचे काम करु देत नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले होते. 

४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस

"त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा विषय माझ्यावर सोडा. मी बघतो काय करायचे . त्यावेळी मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, मी चुकून राजकारणात आलो. पण आता पुन्हा चळवळीत आलो गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही, त्यानंतर मी अधिकाऱ्यांसोबत जे केल आहे, ते इकडे सांगू शकणार नाही. यानंतर मेळघाटातील सगळे रस्ते पूर्ण झाले, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

गडकरी म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारले की सरकारमध्ये काय चांगले आणि काय वाईट आहे?  मी त्यांना एका वाक्यात सांगितले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही त्याच नाव सरकार. कारण एखाद्याला शिक्षा करायची म्हटलं की ती पद्धत पूर्ण उलट आहे. एखाद्याने फाईल दाबून ठेवली की ती वरतीच येत नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपा