शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:06 IST

भाजपानं सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.

नागपूर – ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपासाठी या निवडणुका कठीण जाणार असं अनेकजण म्हणत होते. गोव्यात भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीही उतरले होते. परंतु गोव्याच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. ५ राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान केले. गोव्याचा विजय इथेच हे थांबणार नसून एकदिवस महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले की, देशातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाचा पाया मजबूत करण्याचं काम केले. जात, पात धर्म, भाषा यापेक्षा लोकं भविष्याकरता आणि विकासाला मतदान करतात हे लोकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे जातीयवाद आपण नष्ट केलं आहे. जातीयवाद नष्ट करून विकासाच्या मुद्द्यावर गाव, शेतकरी गरिबांना मुलभूत सुविधा कशा देता येतील? आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न मोदींनी उराशी बाळगलं आहे. सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते. नागपूरच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी खूप मोठं योगदान दिले. काही प्रकल्प आणले. एम्स, सिम्बॉसिससारखी इन्स्टिट्यूट नागपूरात आली. आज त्याठिकाणी १० हजार विद्यार्थी शिकत आहेत. भारतात नसेल इतकी सुंदर लायब्ररी नागपूरात महापालिकेने तयार केली. नागपूर शहरात जगातील सर्वात मोठं फाऊंटन होणार आहे. २४ तास जनतेला पाणी मिळवून दिले. अनेक प्रकारचे प्रकल्प, रोजगार आणि सांस्कृतिक विकासासारखे कार्यक्रम भाजपाने यशस्वी केले. नागपूरचा चौफेर विकास भाजपाने केला असं नितीन गडकरींनी सांगितले.

तसेच गोव्यात देवेंद्र फडणवीसांसोबत नागपुरातील, राज्यातील अनेक भाजपा नेते, कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत होते, मेहनत घेतली. त्या सर्वांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. तसेच आता मागच्यावेळी नागपूर महापालिकेत जे यश मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याला मिळेल हा संकल्प प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी करावं. होळीच्या पवित्र दिवशी विजयाचा यशस्वी संकल्प करू असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले.

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस