शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:06 IST

भाजपानं सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.

नागपूर – ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपासाठी या निवडणुका कठीण जाणार असं अनेकजण म्हणत होते. गोव्यात भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीही उतरले होते. परंतु गोव्याच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. ५ राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान केले. गोव्याचा विजय इथेच हे थांबणार नसून एकदिवस महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले की, देशातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाचा पाया मजबूत करण्याचं काम केले. जात, पात धर्म, भाषा यापेक्षा लोकं भविष्याकरता आणि विकासाला मतदान करतात हे लोकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे जातीयवाद आपण नष्ट केलं आहे. जातीयवाद नष्ट करून विकासाच्या मुद्द्यावर गाव, शेतकरी गरिबांना मुलभूत सुविधा कशा देता येतील? आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न मोदींनी उराशी बाळगलं आहे. सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते. नागपूरच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी खूप मोठं योगदान दिले. काही प्रकल्प आणले. एम्स, सिम्बॉसिससारखी इन्स्टिट्यूट नागपूरात आली. आज त्याठिकाणी १० हजार विद्यार्थी शिकत आहेत. भारतात नसेल इतकी सुंदर लायब्ररी नागपूरात महापालिकेने तयार केली. नागपूर शहरात जगातील सर्वात मोठं फाऊंटन होणार आहे. २४ तास जनतेला पाणी मिळवून दिले. अनेक प्रकारचे प्रकल्प, रोजगार आणि सांस्कृतिक विकासासारखे कार्यक्रम भाजपाने यशस्वी केले. नागपूरचा चौफेर विकास भाजपाने केला असं नितीन गडकरींनी सांगितले.

तसेच गोव्यात देवेंद्र फडणवीसांसोबत नागपुरातील, राज्यातील अनेक भाजपा नेते, कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत होते, मेहनत घेतली. त्या सर्वांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. तसेच आता मागच्यावेळी नागपूर महापालिकेत जे यश मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याला मिळेल हा संकल्प प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी करावं. होळीच्या पवित्र दिवशी विजयाचा यशस्वी संकल्प करू असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले.

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस