शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:06 IST

भाजपानं सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.

नागपूर – ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपासाठी या निवडणुका कठीण जाणार असं अनेकजण म्हणत होते. गोव्यात भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीही उतरले होते. परंतु गोव्याच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. ५ राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान केले. गोव्याचा विजय इथेच हे थांबणार नसून एकदिवस महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले की, देशातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाचा पाया मजबूत करण्याचं काम केले. जात, पात धर्म, भाषा यापेक्षा लोकं भविष्याकरता आणि विकासाला मतदान करतात हे लोकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे जातीयवाद आपण नष्ट केलं आहे. जातीयवाद नष्ट करून विकासाच्या मुद्द्यावर गाव, शेतकरी गरिबांना मुलभूत सुविधा कशा देता येतील? आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न मोदींनी उराशी बाळगलं आहे. सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते. नागपूरच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी खूप मोठं योगदान दिले. काही प्रकल्प आणले. एम्स, सिम्बॉसिससारखी इन्स्टिट्यूट नागपूरात आली. आज त्याठिकाणी १० हजार विद्यार्थी शिकत आहेत. भारतात नसेल इतकी सुंदर लायब्ररी नागपूरात महापालिकेने तयार केली. नागपूर शहरात जगातील सर्वात मोठं फाऊंटन होणार आहे. २४ तास जनतेला पाणी मिळवून दिले. अनेक प्रकारचे प्रकल्प, रोजगार आणि सांस्कृतिक विकासासारखे कार्यक्रम भाजपाने यशस्वी केले. नागपूरचा चौफेर विकास भाजपाने केला असं नितीन गडकरींनी सांगितले.

तसेच गोव्यात देवेंद्र फडणवीसांसोबत नागपुरातील, राज्यातील अनेक भाजपा नेते, कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत होते, मेहनत घेतली. त्या सर्वांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. तसेच आता मागच्यावेळी नागपूर महापालिकेत जे यश मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याला मिळेल हा संकल्प प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी करावं. होळीच्या पवित्र दिवशी विजयाचा यशस्वी संकल्प करू असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले.

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस