शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:06 IST

भाजपानं सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं नितीन गडकरींनी सांगितले.

नागपूर – ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपासाठी या निवडणुका कठीण जाणार असं अनेकजण म्हणत होते. गोव्यात भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळालं. या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीही उतरले होते. परंतु गोव्याच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. ५ राज्याच्या निवडणुकीच्या निकालाचं वैशिष्ट म्हणजे जात, पात धर्म, भाषा यात न पडता भविष्यासाठी भारतीय जनता पार्टीला मतदान केले. गोव्याचा विजय इथेच हे थांबणार नसून एकदिवस महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) म्हणाले की, देशातील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपाचा पाया मजबूत करण्याचं काम केले. जात, पात धर्म, भाषा यापेक्षा लोकं भविष्याकरता आणि विकासाला मतदान करतात हे लोकांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे जातीयवाद आपण नष्ट केलं आहे. जातीयवाद नष्ट करून विकासाच्या मुद्द्यावर गाव, शेतकरी गरिबांना मुलभूत सुविधा कशा देता येतील? आत्मनिर्भर भारत बनवण्याचं स्वप्न मोदींनी उराशी बाळगलं आहे. सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होते, चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते. नागपूरच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी खूप मोठं योगदान दिले. काही प्रकल्प आणले. एम्स, सिम्बॉसिससारखी इन्स्टिट्यूट नागपूरात आली. आज त्याठिकाणी १० हजार विद्यार्थी शिकत आहेत. भारतात नसेल इतकी सुंदर लायब्ररी नागपूरात महापालिकेने तयार केली. नागपूर शहरात जगातील सर्वात मोठं फाऊंटन होणार आहे. २४ तास जनतेला पाणी मिळवून दिले. अनेक प्रकारचे प्रकल्प, रोजगार आणि सांस्कृतिक विकासासारखे कार्यक्रम भाजपाने यशस्वी केले. नागपूरचा चौफेर विकास भाजपाने केला असं नितीन गडकरींनी सांगितले.

तसेच गोव्यात देवेंद्र फडणवीसांसोबत नागपुरातील, राज्यातील अनेक भाजपा नेते, कार्यकर्ते प्रचारासाठी फिरत होते, मेहनत घेतली. त्या सर्वांच्या परिश्रमाचं हे फळ आहे. तसेच आता मागच्यावेळी नागपूर महापालिकेत जे यश मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आपल्याला मिळेल हा संकल्प प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांनी करावं. होळीच्या पवित्र दिवशी विजयाचा यशस्वी संकल्प करू असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केले.

टॅग्स :BJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस