शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनासाठी पुढील दोन महिने महत्त्वाचे! प्रवासामधून पसरण्याचा धोका अधिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 21:32 IST

Nagpur News दिवाळी होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना स्थितीचा अंदाज येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देदिवाळीतही कोरोना नियंत्रणात

नागपूर : दिवाळीच्या काळात बाजारात झालेली गर्दी, प्रवाशांमध्ये झालेली वाढ व कोरोना नियंमाचा पडलेला विसर, यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, दिवाळी होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना स्थितीचा अंदाज येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सव पाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही नागपुरात मागील तीन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून आलेली नाही. मात्र, पुढे ख्रिसमस व नववर्षाचा जल्लोष असल्याने पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच फेब्रुवारी, मार्च महिन्यात तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे गाफील राहिल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-हायरिस्कसाठी बुस्टर डोसचा विचार व्हावा - डॉ. जय देशमुख

प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोना संपला असल्याचे मानले जात असतानाच युरोपात अचानक रुग्णसंख्या वाढली. ऑस्ट्रलीयावर पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. जर्मनीतील परिस्थिती विकोपाला गेली. तिथेही लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोरोनाचे नियम न पाळणे हे धोकादायक ठरणार आहे. आपल्यासाठी डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे, जे हायरिस्क आहेत त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोसचा विचार करायला हवा. सरकारनेही याला गंभीरतेने घेऊन यावर निर्णय घ्यायला हवा.

-रुग्णसंख्या वाढेल, परंतु भयावह स्थिती राहणार नाही - डॉ. अशोक अरबट

प्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, क्रिम्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण भरती आहेत. हे रुग्ण गुजरातमधील एका लग्न समारंभात गेले होते. तिथे त्यांच्या कुटुंबातील ७ ते ८ जण बाधित आले. यावरून कोरोनाचा प्रवास संपलेला नाही. सध्या आपल्याकडे विविध कारणांनी प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता अधिक आहे. परंतु दुसऱ्या लाटेसारखी भयावह स्थिती राहणार नाही. सौम्य लक्षणे असलेले रुग्णच अधिक दिसून येतील. जे मध्यम लक्षणांपासून गंभीर लक्षणांकडे जातील, तेच रुग्णालयात भरती होऊन उपचार घेतील. विशेषत: कोरोनाचा २० ते २५ टक्केच रुग्ण उपचाराखाली राहतील. यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

-कोरोनोचा नवा व्हेरियंट आलाच तरच धोका -डॉ. प्रशांत जोशी

कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रशांत जोशी म्हणाले, दिवाळीनंतरही कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. परंतु युरोपमध्ये लसीकरण होऊनही तिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आपल्याकडे लसीकरणाला सुरुवात होऊन जवळपास १० महिन्यांचा कालावधी झाला आहे. यामुळे दोन्ही डोस घेऊनही रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता अधिक आहे. यातच नवीन व्हेरियंट आलाच तरच धोका होण्याची भीती आहे. यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे.

::विदर्भात मागील तीस दिवसांची स्थिती

२१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर : २१० रुग्ण

५ ते १९ नोव्हेंबर :२०० रुग्ण

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस