शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

"वर्तमानपत्रांनी बातम्या देताना विचारधारेचं दही किंवा लोणचं लावू नये"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 19:03 IST

नागपूर इथं होत असलेल्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं.

नागपूर -  माध्यमांतील बातम्यांमध्ये विचारांचे दही किंवा लोणचं टाकल्यानंतर काय होईल. आज वर्तमानपत्र जे मनात येईल ते छापत आहेत, मग कुठल्या लोकशाहीची तुम्ही चर्चा करताय. काही वर्तमानपत्रांच्या पहिल्या लीड बातम्या अशा असतात, ज्यातून त्यांचे विचार स्पष्ट होतात. मग, ही बातमी कुठे आहे, ही विचारधारा आहे. या वर्तमानपत्रांनी ही विचारधारा म्हणून प्रोजेक्ट करायला हवं, असे परखड मत वरिष्ठ पत्रकार अंकुश श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. 

नागपूर इथं होत असलेल्या लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये वरिष्ठ पत्रकारांनी आजच्या माध्यमांच्या भूमिकेबद्दल परखड शब्दात आपलं मत माडंलं. त्यामध्ये, देशातील वरिष्ठ पत्रकार सहभागी झाले होते. येथे बोलताना श्रीवास्तव यांनी म्हटलं की,  आजच्या काळात आणीबाणीचा काळ आठवण गरजेचं आहे. कारण, आजच्या चर्चेचा विषय आहे की, माध्यमाचं धुव्रीकरण झालंय का? याचाच अर्थ देशातील लोकशाही जिवंत आहे की नाही, असेही कोणीतरी म्हणू शकते. मात्र, परिस्थिती आज तशी नाही. आपण जो अनुभव घेतलाय, गेल्या ६० ते ७० वर्षात त्यात निश्चित बदल झालाय. आम्ही जेव्हा रेशनच्या दुकानात जात होतो, तेव्हा तो दुकानदारही भल्यामोठ्या रांगतून हाकलून देत होता. तिथं स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि इतरही लोकं गप्प बसत होते, तिथे पत्रकार तरी काय आवाज उठवणार?, असे म्हणत आज पत्रकारितेतून आवाज बुलंद झालाय, असे अकुश श्रीवास्तव यांनी म्हटले. 

आम्ही पत्रकारितेचा तो काळ पाहिलाय, ज्यामध्ये महिनाभरातील ३० पैकी २५ दिवस केवळ पंतप्रधानांचंच भाषण असायचं. एक दिवस राष्ट्रपतींचं भाषण असायच आणि उरलेल्या इतर दिवशी दुर्घटना, अपघात किंवा काही बातम्या असायच्या. तेव्हा आजच्या सारखी पत्रकारिता नव्हती की, तुम्ही प्रश्न विचारत होतात?. बेरोजगारी, महागाईचे प्रश्न उपस्थित करत होतात. आज महागाई ०.२ टक्के वाढली तरी ती बातमी लीड होतेय, ९० च्या दशकानंतर मोठा बदल या क्षेत्रात झालाय. त्यानुसार, आज परखडपणे विरोधात लिहिलं जातंय, छापलं जातंय. 

टॅग्स :LokmatलोकमतMumbaiमुंबईMediaमाध्यमेSocial Mediaसोशल मीडिया