शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

प्रेमविवाहाचा करुण अंत! विवाहितेची सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 11:39 IST

 बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने हे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागपूर : बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली आहे. ऋतु पंकज खडसे (३१) असे विवाहितेचे नाव आहे.

लग्न म्हटलं की दोन जीवांचं नव्हे दोन कुटुंबाचं मिलन अस आपल्या समाजात मानले जाते. मात्र, यावरील विश्वासहार्तता किती, हा ही एक प्रश्नच आहे. दररोज कौटुंबिक हिंसाचाराच्या कित्येक घटना आपल्या समोर येतात. त्यातही प्रेमविवाह करणाऱ्यांना दोन्ही घरच्यांच्या नाराजीतून जावे लागते.  

ऋतु आणि अभियंता पंकज खडसे यांचे नाते मैत्रीतून प्रेमात फुलले. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहणे सुरू केले व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाहता-पाहता या लग्नाला ३ वर्ष लोटली. पंकज एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. दोघेही जयंतीनगरीत सातव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते. 

बुधवारी सकाळी ११.३० वाजता ऋतुने गॅलरीतून उडी घेतली यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ऋतुच्या नातेवाइकांना याची सूचना दिली. पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली; परंतु त्यांना आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली कोणतीच चिठ्ठी आढळली नाही. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याची शंका आहे.

घटनेपूर्वी तिचा पती पंकज सोबत वाद झाल्याची माहिती आहे. ती पंकजवर शंका घेत होती. ऋतुच्या आई-वडिलांचे बयाण झाल्यावरच तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकते. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने आत्महत्या केल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाDeathमृत्यू