शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रेमविवाहाचा करुण अंत! विवाहितेची सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 11:39 IST

 बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने हे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नागपूर : बेलतरोडीच्या जयंतीनगरीत एका विवाहितेने सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आली आहे. ऋतु पंकज खडसे (३१) असे विवाहितेचे नाव आहे.

लग्न म्हटलं की दोन जीवांचं नव्हे दोन कुटुंबाचं मिलन अस आपल्या समाजात मानले जाते. मात्र, यावरील विश्वासहार्तता किती, हा ही एक प्रश्नच आहे. दररोज कौटुंबिक हिंसाचाराच्या कित्येक घटना आपल्या समोर येतात. त्यातही प्रेमविवाह करणाऱ्यांना दोन्ही घरच्यांच्या नाराजीतून जावे लागते.  

ऋतु आणि अभियंता पंकज खडसे यांचे नाते मैत्रीतून प्रेमात फुलले. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहणे सुरू केले व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पाहता-पाहता या लग्नाला ३ वर्ष लोटली. पंकज एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. दोघेही जयंतीनगरीत सातव्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते. 

बुधवारी सकाळी ११.३० वाजता ऋतुने गॅलरीतून उडी घेतली यात तिचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच बेलतरोडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ऋतुच्या नातेवाइकांना याची सूचना दिली. पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली; परंतु त्यांना आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली कोणतीच चिठ्ठी आढळली नाही. कौटुंबिक वादातून तिने आत्महत्या केल्याची शंका आहे.

घटनेपूर्वी तिचा पती पंकज सोबत वाद झाल्याची माहिती आहे. ती पंकजवर शंका घेत होती. ऋतुच्या आई-वडिलांचे बयाण झाल्यावरच तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकते. प्रेम विवाहाच्या तीन वर्षातच तिने आत्महत्या केल्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सध्या पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाDeathमृत्यू