शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

कोराडीत नवे दोन वीज संच : मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 10:10 PM

दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.

ठळक मुद्देसुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.वीज नियामक आयोगाकडून या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून २० टक्के भागभांडवल मिळण्यासाठ़ी प्रस्ताव सादर करण्यासही मान्यता देण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा विजेची सर्वाधिक मागणी २५ हजार मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली आहे. तसेच १९ व्या ऊर्जा सर्वेक्षणानुसार अनुमानित केलेली विजेची मागणी २०३६३ मेगावॉट आहे. त्यापेक्षाही अधिक मागणीची नोंद यंदा झाली आहे.महावितरणच्या पुनरावलोकनानुसार सन २०२३-२४ मध्ये २७०० पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन २०१२३-२४ साठ़ीचा २५ हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता २०१९ मेगावॅट विजेची तूट भासू शकते. महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता १३६०२ मेगावॉट असून त्यापैकी १०१७० मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी महानिर्मितीचे १६८० मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.ही वस्तुस्थिती लक्षात घेता २ बाय ६६० मेगावॉट नवीन संचाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. सध्या संच क्रमांक १ ते ४ बंद आहेत. या संचांच्या इमारती व संरचना हटवून ती जागा नवीन संचासाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे नवीन संचांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रस्तावित संचांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कोराडी वीज केंद्र येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्वीच यार्डमध्ये आवश्यक ते बदल करून त्याद्वारे निर्गमित होऊ शकते.या प्रकल्पात संच क्रमांक १ काम पूर्ण होण्यासाठी ४५ महिने व संच क्रमांक २ पूर्ण होण्यासाठी ५१ महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के रकक्म कर्ज रूपाने तर २० टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.संच क्रमांक ६ चे नूतनीकरण जागतिक बँकेच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्राच्या पुनर्वसन प्रकल्पानुसार महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक ६ चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४८६ कोटी व महाराष्ट्र शासनाकडून ९६ कोटींच्या भागभांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास ५६३.१२ कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर