शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

नवीन शैक्षणिक धोरण सकारात्मक बदल घडवेल : सिद्धार्थविनायक काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:43 IST

वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत सकारात्मक व आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर गुरुवारी मंथन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत सकारात्मक व आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर गुरुवारी मंथन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सेंटर पॉईंट कॉलेज येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे या होत्या. तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर हे वक्ता म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या शिक्षण प्रणालीसंदर्भात अनेक चुका झाल्या. आपल्या प्रणालीत दर्जेदार शिक्षणाचा निश्चितपणे अभाव जाणवून आला. काही प्रमाणात या प्रणालीने शैक्षणिक विषमतादेखील निर्माण केली. नवीन शैक्षणिक धोरणात मात्र सर्वांगीण विचार करण्यात आल्याचे दिसून येते. ५-३-३-४ अशी शैक्षणिक प्रणाली असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्येच शिक्षण सोडल्यास झालेल्या शिक्षणाचेदेखील प्रमाणपत्र मिळणार आहे. पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल व चार वर्षांत ऑनर्स’ झालेला विद्यार्थी थेट ‘पीएचडी’ला नोंदणी करू शकेल, अशी माहिती डॉ.काणे यांनी यावेळी दिली.सद्यस्थितीत देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आले आहे. हे धोरण शिक्षणाची दिशा बदलविणारे ठरू शकते. यातून शिक्षकांचा ‘माईंडसेट’ बदलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता एका विद्यार्थ्याला कितीही अभ्यासक्रम घेता येतील. याशिवाय संशोधन, केवळ शिक्षण यासाठी विविध विद्यापीठे व महाविद्यालये असतील. केवळ शोधपत्रिका म्हणजेच संशोधन ही संकल्पना मोडित निघेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक समस्या व मुद्दे लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करता येणार आहेत, असे डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. विद्यापीठ शिक्षण मंचचे सचिव डॉ.संजय दुधे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांनी वैयक्तिक गीत सादर केले तर डॉ.अमिषी अरोरा यांनी संचालन केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEducationशिक्षण