शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
3
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
4
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
5
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
6
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
7
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
8
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
9
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
10
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
11
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
13
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
14
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
15
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
16
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
17
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
18
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
19
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
20
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शैक्षणिक धोरण सकारात्मक बदल घडवेल : सिद्धार्थविनायक काणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:43 IST

वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत सकारात्मक व आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर गुरुवारी मंथन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्तमान शिक्षण प्रणालीत विद्यार्थी ज्ञान व कौशल्य नव्हे तर गुणांसाठी, प्रवेशासाठी झटताना दिसतात. गुणांच्या शर्यतीत मागे पडल्यावर निराशा हाती येते. त्यामुळे ही शिक्षण प्रणाली मानसिक नैराश्यात नेणारी आहे की काय, असा विचार येतो. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत सकारात्मक व आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. यातून शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो, असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ शिक्षण मंचतर्फे नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यावर गुरुवारी मंथन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.सेंटर पॉईंट कॉलेज येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ.कल्पना पांडे या होत्या. तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेकर हे वक्ता म्हणून उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या शिक्षण प्रणालीसंदर्भात अनेक चुका झाल्या. आपल्या प्रणालीत दर्जेदार शिक्षणाचा निश्चितपणे अभाव जाणवून आला. काही प्रमाणात या प्रणालीने शैक्षणिक विषमतादेखील निर्माण केली. नवीन शैक्षणिक धोरणात मात्र सर्वांगीण विचार करण्यात आल्याचे दिसून येते. ५-३-३-४ अशी शैक्षणिक प्रणाली असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मध्येच शिक्षण सोडल्यास झालेल्या शिक्षणाचेदेखील प्रमाणपत्र मिळणार आहे. पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा असेल व चार वर्षांत ऑनर्स’ झालेला विद्यार्थी थेट ‘पीएचडी’ला नोंदणी करू शकेल, अशी माहिती डॉ.काणे यांनी यावेळी दिली.सद्यस्थितीत देशभरात नवीन शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणातील मसुद्यानुसार शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल प्रस्तावित करण्यात आले आहे. हे धोरण शिक्षणाची दिशा बदलविणारे ठरू शकते. यातून शिक्षकांचा ‘माईंडसेट’ बदलविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता एका विद्यार्थ्याला कितीही अभ्यासक्रम घेता येतील. याशिवाय संशोधन, केवळ शिक्षण यासाठी विविध विद्यापीठे व महाविद्यालये असतील. केवळ शोधपत्रिका म्हणजेच संशोधन ही संकल्पना मोडित निघेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक समस्या व मुद्दे लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करता येणार आहेत, असे डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. विद्यापीठ शिक्षण मंचचे सचिव डॉ.संजय दुधे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांनी वैयक्तिक गीत सादर केले तर डॉ.अमिषी अरोरा यांनी संचालन केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठEducationशिक्षण