शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे : विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:08 IST

भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे, असे आवाहन संगणकतज्ज्ञ तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर यांनी केले.

ठळक मुद्देदादासाहेब काळमेघ स्मृती समारंभात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेनेविज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे, असे आवाहन संगणकतज्ज्ञ तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर यांनी केले.स्व. दादासाहेब काळमेघ यांचा २२ वा स्मृतिदिन मातोश्री विमलाबाई पंजाबराव देशमख सभागृहात सोमवारी सायंकाळी डॉ. भटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा तसेच आमदार प्रा.अनिल सोले, माजी महापौर डॉ. कल्पना पांडे होत्या. यावेळी डॉ. भटकर यांनी स्व. दादासाहेबांच्या स्मृतीला उजाळा दिला. ते म्हणाले, दादासाहेब विज्ञानाचे विद्यार्थी होते. कसलीही सुबत्ता नसताना त्यांनी अनेक शाळा उघडल्या. यशस्वी युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते पूर्ण झाले. आज चांद्रयान आम्ही पाठवू शकलो, ही शिक्षणाची संधी दादासाहेबांसारख्याच्या परिश्रमातून मिळाली. त्यामुळे देश या सर्वांचा ऋणी आहे.डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून दादासाहेबांच्या जीवनकर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले, दादासाहेबांनी सामाजिक जबाबदारी केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून कार्य केले. विद्यापीठाचे लोकविद्यापीठात रूपांतरण होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. विद्यापीठाच्या कार्यात लोकशाहीपूरक सहभाग कसा असावा, हे आपण त्यांच्याकडून शिकलो. १९७९ ते १९८१ या त्यांच्या व्हाईस चान्सलरपदाच्या काळामध्ये विद्यापीठाचे कायदे लिहिले गेले. त्यावर आजही कार्य चालत आहे. आयुष्याची किंमत चुकवून निष्ठेने आणि एकाकीपणे ते लढले. ते सर्वसामान्यांतून आले. सोबत शिदोरी घेऊन आले, मात्र आयुष्यभर भाकरी वाटत राहिले, अशा शब्दात मिश्रा यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. त्यांची जीवननिष्ठा व कार्य पुढे चालविणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले.आमदार अनिल सोले म्हणाले, अभाविपचा सचिव म्हणून काम करताना विद्यापीठातील आंदोलनाच्या काळात दादासाहेबांचे कार्य जवळून पाहता आले. विद्यापीठाचे अनेक विषय त्यांच्यासमोर नेण्याची संधी मिळाली. त्यातून शिकता आले. डॉ. कल्पना पांडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला.प्रारंभी स्व. दादासाहेब स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. पी.एम. ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठीचा आग्रहशिक्षण लोकाभिमुख असावे, त्याची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली असावी. भाषा लोपली की संस्कृती जाते, हे सांगून डॉ. विजय भटकर यांनी मराठीचा आग्रह धरला. ते म्हणाले, विज्ञानाचे शोध सर्वसामान्यांपर्यत पोहचायला हवे. मराठी कळते, पण स्मार्टफोनमध्ये इ-मेल मराठीत नसेल तर सर्वसामान्यांना काय फायदा? शेतकऱ्यांना मोबाईलवरील इंग्रजी अर्थशास्त्र, कॉमर्स कळत नसेल तर काय फायदा ? स्मार्टफोनवर मराठी वापरता येत असेल तरच विज्ञानाच्या तंत्राचा फायदा सामान्यांना होईल. हे तंत्र सामान्यांचे व्हावे. शिक्षणपद्धतीमध्ये लवचिकता असावी. मराठी आणि गणित सर्वांना येईल, याचा आग्रह आणि विचार शैक्षणिक संस्थांनी करावा.

टॅग्स :Educationशिक्षणscienceविज्ञान