शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे : विजय भटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:08 IST

भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेने विज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे, असे आवाहन संगणकतज्ज्ञ तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर यांनी केले.

ठळक मुद्देदादासाहेब काळमेघ स्मृती समारंभात आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृती ज्ञानाधिष्ठित आहे. या संस्कृतीला अध्यात्माचीही जोड आहे. लीळाचरित्रांच्याही आधीपासून या संस्कृतीने आयुर्वेद सांगितला आहे. या देशाने मांडलेले स्वतंत्र विज्ञान आहे. त्यातील वैदिक विचार समाजापुढे आणावा लागेल. त्यासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेनेविज्ञानाचे सर्व पैलू समजून घ्यावे, असे आवाहन संगणकतज्ज्ञ तथा नालंदा विश्वविद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर यांनी केले.स्व. दादासाहेब काळमेघ यांचा २२ वा स्मृतिदिन मातोश्री विमलाबाई पंजाबराव देशमख सभागृहात सोमवारी सायंकाळी डॉ. भटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा तसेच आमदार प्रा.अनिल सोले, माजी महापौर डॉ. कल्पना पांडे होत्या. यावेळी डॉ. भटकर यांनी स्व. दादासाहेबांच्या स्मृतीला उजाळा दिला. ते म्हणाले, दादासाहेब विज्ञानाचे विद्यार्थी होते. कसलीही सुबत्ता नसताना त्यांनी अनेक शाळा उघडल्या. यशस्वी युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी, हे त्यांचे स्वप्न होते. शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते पूर्ण झाले. आज चांद्रयान आम्ही पाठवू शकलो, ही शिक्षणाची संधी दादासाहेबांसारख्याच्या परिश्रमातून मिळाली. त्यामुळे देश या सर्वांचा ऋणी आहे.डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून दादासाहेबांच्या जीवनकर्तृत्वाचा आढावा घेतला. ते म्हणाले, दादासाहेबांनी सामाजिक जबाबदारी केवळ जबाबदारी म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून कार्य केले. विद्यापीठाचे लोकविद्यापीठात रूपांतरण होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. विद्यापीठाच्या कार्यात लोकशाहीपूरक सहभाग कसा असावा, हे आपण त्यांच्याकडून शिकलो. १९७९ ते १९८१ या त्यांच्या व्हाईस चान्सलरपदाच्या काळामध्ये विद्यापीठाचे कायदे लिहिले गेले. त्यावर आजही कार्य चालत आहे. आयुष्याची किंमत चुकवून निष्ठेने आणि एकाकीपणे ते लढले. ते सर्वसामान्यांतून आले. सोबत शिदोरी घेऊन आले, मात्र आयुष्यभर भाकरी वाटत राहिले, अशा शब्दात मिश्रा यांनी दादासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. त्यांची जीवननिष्ठा व कार्य पुढे चालविणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन त्यांनी केले.आमदार अनिल सोले म्हणाले, अभाविपचा सचिव म्हणून काम करताना विद्यापीठातील आंदोलनाच्या काळात दादासाहेबांचे कार्य जवळून पाहता आले. विद्यापीठाचे अनेक विषय त्यांच्यासमोर नेण्याची संधी मिळाली. त्यातून शिकता आले. डॉ. कल्पना पांडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला.प्रारंभी स्व. दादासाहेब स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. पी.एम. ढोले यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मराठीचा आग्रहशिक्षण लोकाभिमुख असावे, त्याची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली असावी. भाषा लोपली की संस्कृती जाते, हे सांगून डॉ. विजय भटकर यांनी मराठीचा आग्रह धरला. ते म्हणाले, विज्ञानाचे शोध सर्वसामान्यांपर्यत पोहचायला हवे. मराठी कळते, पण स्मार्टफोनमध्ये इ-मेल मराठीत नसेल तर सर्वसामान्यांना काय फायदा? शेतकऱ्यांना मोबाईलवरील इंग्रजी अर्थशास्त्र, कॉमर्स कळत नसेल तर काय फायदा ? स्मार्टफोनवर मराठी वापरता येत असेल तरच विज्ञानाच्या तंत्राचा फायदा सामान्यांना होईल. हे तंत्र सामान्यांचे व्हावे. शिक्षणपद्धतीमध्ये लवचिकता असावी. मराठी आणि गणित सर्वांना येईल, याचा आग्रह आणि विचार शैक्षणिक संस्थांनी करावा.

टॅग्स :Educationशिक्षणscienceविज्ञान