शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकाचे रुपडे बदलणार

By नरेश डोंगरे | Updated: February 24, 2024 21:08 IST

विविध विकासकामांना प्रारंभ : आमगाव, कामठी आणि भंडारा रेल्वे स्थानकांचाही पुनर्विकास

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :रेल्वे मंत्रालयाच्या महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर क्षेत्रातील नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्थानकांवर विकास कामांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे लवकरच या रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील १२०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा शिलान्यास केला आहे. त्यावेळी या यादीत दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेच्या गोंदिया, वडसा आणि चांदाफोर्ट या तीन रेल्वे स्थानकांचाही समावेश करण्यात आला होता. तर, अन्य काही स्थानकांच्या विकासाचा आराखडा तयार करून त्यांचाही पुनर्विकास करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार, आता नागपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानक, आमगाव, कामठी, भंडारा रोड, तुमसर रोड, राजनांदगाव, डोंगरगड, बालाघाट, शिवनी, नैनपूर, मंडला फोर्ट, आणि छिंदवाडा या १२ रेल्वे स्थानकांच्याही विकासाचा आराखडा तयार झाला असून, तसे डिझाईनही तयार करण्यात आले आहे.

यातील नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वेस्थानकावर प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार असल्याचा दावा दपूम रेल्वे प्रशासनाने केला आहे. ज्यात प्रशस्त आणि आरामदायक वेटिंग हॉल, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी एस्किलेटरसह अन्य सुविधांचाही त्यात प्रामुख्याने समावेश राहणार आहे.

१२.३९ कोटींची तरतूद

नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकाच्या विकासकामांसाठी १२.३९ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. त्यातून स्थानकाची नवी आकर्षक ईमारत, उद्यान, प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही, हायमास्ट, स्वच्छ शाैचालय आणि रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभिकरण आदी कामांचा समावेश आहे. परिसरातील संस्कृती आणि वारसासुद्धा चित्रांतून दाखविला जाईल.

सिटी सेंटरची संकल्पना

शहराच्या गजबजलेल्या भागात असलेल्या या रेल्वे स्थानकाला दोन्ही बाजूने जोडून सिटी सेंटर सारखे विकसित करण्याची योजना आहे. त्यामुळे या परिसरात प्रवाशांसोबत अन्य नागरिकांची गर्दी वाढून त्या भागातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण होईल.

 

टॅग्स :railwayरेल्वे