शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

प्रतिभावंतांना नाकारणारा समाज मूल्यहीन

By admin | Updated: December 1, 2014 00:49 IST

श्रम व प्रतिभेला प्रतिष्ठा नाकारणारा समाज मूल्यहीन असतो, असे परखड मत कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.

वेदप्रकाश मिश्रा : सनराईज पीस मिशनचे पुरस्कार वितरितनागपूर : श्रम व प्रतिभेला प्रतिष्ठा नाकारणारा समाज मूल्यहीन असतो, असे परखड मत कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी व्यक्त केले.सनराईज पीस मिशनच्या विविध पुरस्कारांचे रविवारी वितरण करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी खासदार गेव्ह आवारी अध्यक्षस्थानी, तर व्यासपीठावर भाजप नेते जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम श्रद्धानंदपेठेतील मुंडले प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात पार पडला.समाजाचा अंतरात्मा जिवंत ठेवायचा असेल तर, गुणवंतांचा सत्कार करणे आवश्यक आहे. समाज बाजारवादावर कधीच चालत नाही. उन्नत समाज घडविण्यासाठी मूल्य जतन झाले पाहिजे. दुर्दैवाने समाजात प्रतिभेला डावलून पदाचा सत्कार केला जात आहे. समाजात भरपूर प्रतिभा आहे, पण तिला संधी मिळत नाही, असे मिश्रा यांनी सांगितले.तिवारी यांनी माणुसकी नसलेली व्यक्ती सत्कारास अयोग्य असल्याचे नमूद केले. देशात विध्वंसक कारवाया करणारे दहशतवादी उच्चशिक्षित असतात. यावरून व्यक्ती शिक्षणाने नाही तर संस्काराने मोठी होते हे सिद्ध होते. परिणामी पाठ्यपुस्तकांतून महापुरुषांचे जीवनचरित्र काढून टाकण्याचा विचारही व्हायला नको, असे ते म्हणाले. भारताने इतर देशांच्या तुलनेत वेगाने प्रगती केली आहे. भविष्यात हा देश नक्कीच सुपर पॉवर होईल. भारतीय व्यवस्था आध्यात्मिक मूल्यांवर आधारित आहे. यामुळे देशातील नागरिकांचा शांततेवर विश्वास आहे, असे आवारी यांनी सांगितले, तर गुप्ता यांनी अधिकार व पैशांच्या बळावर पुढे जाण्याच्या विचारसरणीमुळे खरी प्रतिभा वर येत नसल्याची खंत व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हरगोविंद मुरारका यांनी प्रास्ताविक, तर उमाशंकर अग्रवाल व हरीश गुप्ता यांनी संचालन केले. हरीश गुप्ता यांनी आभारही मानले. डॉ. जीवेश पंचभाई, डॉ. राजेश नायक, गोपाल लद्धड, राजेश धरमठोक, विवेक मुरारका आदींनी मान्यवरांचे स्वागत केले.(प्रतिनिधी)