शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जातीभेदाच्या निर्मूलनासाठी कठोर निर्णयांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:55 IST

आपल्या देशाची फाळणी व भाषेच्या नावावर झालेली राज्यांची निर्मिती या दोन मोठ्या चुका होत्या. मात्र आता जातीच्या नावावर विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण एकीकडे जातीभेद नष्ट व्हावा, अशी भाषणे देतात आणि दुसरीकडे जातीच्या नावावर आरक्षण मागतात. या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे जातीभेदाच्या निर्मूलनासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे मत देशाचे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी केले.

ठळक मुद्देसत्यपाल सिंह : स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाची फाळणी व भाषेच्या नावावर झालेली राज्यांची निर्मिती या दोन मोठ्या चुका होत्या. मात्र आता जातीच्या नावावर विभाजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक जण एकीकडे जातीभेद नष्ट व्हावा, अशी भाषणे देतात आणि दुसरीकडे जातीच्या नावावर आरक्षण मागतात. या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही. त्यामुळे जातीभेदाच्या निर्मूलनासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे मत देशाचे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंह यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्कार व तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.हिंदी मोरभवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, सचिव डॉ.अजय कुलकर्णी, कार्याध्यक्ष शिरीष दामले प्रामुख्याने उपस्थित होते. आ.संजय पुराम, सविता पुराम यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक अभिसरण पुरस्काराने तर प्रतिमा शास्त्री यांचा तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आपल्या देशात सावरकरांना योग्य तो सन्मान देण्यात आला नाही. सावरकर द्रष्टे होते. त्यांची प्रेरणा घेऊन राजकारणात चांगल्या तरुणांनी येण्याची गरज आहे. जातीय भेदभाव संपावा यासाठी सामाजिक आंदोलन निर्माण झाले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.सिंह यांनी केले. यावेळी आ.संजय पुराम, सविता पुराम व डॉ.प्रतिमा शास्त्री यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अजय कुलकर्णी यांनी केले. डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अनिल देव यांनी संचालन केले तर मिलिंद कानडे यांनी आभार मानले. प्रशांत उपगडे व जयंत उपगडे यांनी यावेळी सावरकर लिखित गीत व वंदेमातरम्चे सादरीकरण केले.शस्त्रांच्या बाबतीत देश स्वावलंबी होतोय : अहीरस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जातीव्यवस्थेविरोधात आवाज उठविला होता. देशात जातीच्या आधारावरील भेदाभेद संपविण्याची गरज आहे. देशाने शस्त्रसंपन्न असले पाहिजे. बलवान असल्यावर समोरचे लोक झुकतात, असे सावरकर नेहमी म्हणायचे. सावरकरांच्या विचारांचा आदर्श घेऊनच देश शस्त्रसंपन्न होत आहे. ७० टक्के शस्त्रांचे उत्पादन देशात होत आहे. शस्त्रसज्जतेच्या बाबतीत आपण स्वावलंबी होत आहोत, असे अहीर यांनी सांगितले.गुंड आणि विद्वानांच्या मताचा दर्जा एकच कसा ?यावेळी डॉ.सत्यपाल सिंह यांनी मतदानाच्या पद्धतीवरच आक्षेप नोंदविला. समाजाला त्रासवून सोडणारा गुंड व आपल्या विद्वत्तेच्या जोरावर विधायक कार्य करणारे विद्वान यांच्या मताचा दर्जा एकच कसा असतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा फार मोठा विरोधाभास आहे. यावर विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगnagpurनागपूर