शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता स्वदेशी व स्वावलंबनाची जोड देण्याची गरज : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2022 1:42 PM

येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

नागपूर : ‘इंधन क्षेत्रात मागील काही काळापासून मोठा बदल झाला आहे. आज इथेनॉलवर चालणारे जनरेटर आले असून, वाहने इथेनॉलवर चालवली जात आहेत. इलेक्ट्रिक बसेसदेखील बाजारात आल्या आहेत. पेट्रोल व डिझेलचे पंप बंद करून त्याजागी इथेनॉलचे व इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन निर्माण करायचे आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. स्वदेशी जागरण मंचाचे माजी अ. भा. संयोजक प्रा. योगानंद काळे यांच्या ‘स्वदेशी एक चिंतन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.

आधुनिक तंत्रज्ञानाला विरोध न करता त्याला स्वदेशी आणि स्वावलंबनाची जोड देण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ही आयात करणारी नाही, तर निर्यात करणारी झाली पाहिजे. असे झाले तरच भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असेदेखील गडकरी म्हणाले.

भारतीय संस्कृती आणि इतिहास हा भारतीय विचारधारेशी संबंधित आहे. स्वदेशी विचारांना तंत्रज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता आहे. विदेशी तंत्रज्ञानाला विरोध न करता ते आपल्याकडे कसे विकसित होईल आणि त्याला स्वदेशी व स्वावलंबनाची जोड कशी देता येईल, यादृष्टीने विचार करावा. कृषी क्षेत्रात स्वदेशीचा प्रचार स्वदेशी जागरण मंचाने करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले. यावेळी डॉ. विनायक देशपांडे, शिरीष तारे, धनंजय भिडे, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीEconomyअर्थव्यवस्थाtechnologyतंत्रज्ञान