शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

'कोरोना'ला रोखण्यासाठी 'त्रिसुत्री'चा अवलंब करण्याची गरज - राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 10:22 IST

महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज

नागपूर : चिनमध्ये कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. याबाबत बोलताना माजी आरोग्यमंत्रीराजेश टोपे म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्रिसुत्री फार्मुला आत्तापासूनच राबविण्याची गरज आहे.

जगात कोरोनाचा नवा व्हेरियंटचा उद्रेक झाला आहे. आजपर्यंत देशात सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आत्ताच सावध होऊन ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट हा फार्मुला तत्काळ राबविण्याची गरज आहे. सोबतच ऑक्सिजन प्लांट उभारले होते, त्याच्या स्थितीचा आढावा घेणे, आयसोलेश वॉर्ड सुरू करणे, औषधांची पूर्तता करणे, आरोग्य विभागाच्या रिक्त जागा भरणे गरजेचे आहे. तसेच तातडीने स्टेट टाक्स फोर्स गठित करण्याची आवश्यकता आहे. सोबतच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

भारत सरकार अलर्ट मोडवर

जगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, भारत सरकारने प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या आणि देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी कोरोनाची लस घ्यावी असं मी आवाहन करतो. 

राज्य सरकारेही सतर्क

आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले आहे की, सर्व राज्यांनी कोविड-19 संक्रमित प्रकरणांचे नमुने अनुक्रमासाठी INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅब (IGSL) कडे पाठवावेत, जेणेकरून नवीन व्हेरिएंट, काही असल्यास, शोधता येतील. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रानंतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही अलर्ट मोडमध्ये आले आहेत.

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस