शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:47 IST

संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देसुनीलम् : संविधान सन्मान यात्रा नागपुरात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधान हे देशातील सर्व धर्म, पंथ व लोकांना एकसंध ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणाचे कार्य सरकारचे आहे. परंतु गेल्या चार वर्षात सरकार ते करीत नसल्याचे दिसून येते. उलट संविधान न मानणाऱ्यांनापाठीशी घालण्याचे कार्य सरकारकडून होताना दिसून येते. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी सत्तेसोबतच व्यवस्था परिवर्तनाचीही गरज असून हे परिवर्तन जनआंदोलनाच्याच माध्यमातून होईल, असा विश्वास जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. सुनीलम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.देशभरातील ३५० जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे गेल्या २ आॅक्टोबर रोजी दांडी (गुजरात) येथून संविधान सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. गुजरात, मध्यप्रदेश मार्गे ही यात्रा शुक्रवारी नागपुरात दाखल झाली. यावेळी यात्रेत सहभागी झालेले मध्य प्रदेशातील किसान संघाचे डॉ. सुनीलम, प्रफुल्ल सामंतारा (भुवनेश्वर), सुनीती सु.र.(पुणे), आराधना भार्गव, दीपक चौधरी, गुजरात येथील बुलेट ट्रेन विरोधी आंदोलनाचे कृष्णकांत आणि उत्तराखंड येथे पर्यावरण बचाव आंदोलनातील कार्यकर्ते विमलभाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उर्वेला कॉलनी येथे परिषद पार पडली. या परिषदेतही संविधानाच्या संरक्षणासाठी सत्तेसह व्यवस्था परिवर्तनाचे आवाहन करण्यात आले. यावेळी संविधान यात्रेत सहभागी असलेल्या नेत्यांसह माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, प्रा. देवीदास घोडेस्वार, पी.एस. खोब्रागडे, पुंडलिक तिजारे, संजय शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी किशोर पोतनवार यांच्या संविधान पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविक विलास भोंगाडे यांनी केले. संचालन त्रिलोक हजारे यांनी केले. जगजितसिंग यांनी स्वागत केले. नरेश वाहाणे यांनी आभार मानले.सरकार कॉर्पोरेटचे गुलामसध्याचे सरकार हे कॉर्पोरेटचे गुलाम झाले आहेत.अदानी-अंबानींच्या हितासाठीच विकासाची धोरणे राबवली जात आहेत, त्यामुळे सरकारची विकास नितीच चुकीची आहे. तेव्हा हे सरकार सत्तेतून उखडून फेकणे सर्वात महत्त्वाचे आहे, असे प्रफुल्ल सामंतारा यांनी सांगितले. तर सध्या देशात समाजा-समाजामध्ये, जाती-धर्मामध्ये वैमनस्य पसरवले जात आहे, आणि ते पसरवणा ऱ्यांना सरकारचा छुपा पाठिंबा आहे, असा आरोप सुनीती यांनी केला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरnagpurनागपूर