शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

आजारी समाजाला सुधारण्यासाठी लाखो उल्कांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:05 IST

संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंगाने महत्त्वाचा आहे. आज समाज विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे. या समाजाचा आजार दूर करण्यासाठी लाखो उल्कांची गरज आहे, असे मनोगत ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयशवंत मनोहर : उल्का महाजन यांना ताराबाई शिंदे समाजकार्य पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघर्ष माणसाला जीवन जगायला, माणूस वाचायला आणि स्वत:मधील ऊर्जेचा शोध घ्यायला शिकवतो. या संघर्षाकडे डोळेझाक करणाऱ्यांचे आयुष्य सपक आणि अर्थहीन ठरते. उल्का महाजन यांचे जगणे अशाच प्रेरणादायी संघर्षाने भरले आहे. त्यांचा लढा आर्थिक, सामाजिक व राष्ट्रीय अंगाने महत्त्वाचा आहे. आज समाज विशिष्ट मानसिक आजाराने ग्रस्त होत आहे. या समाजाचा आजार दूर करण्यासाठी लाखो उल्कांची गरज आहे, असे मनोगत ज्येष्ठ कवी, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केले.आकांक्षा प्रकाशनतर्फे दिला जाणारा पहिला ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या व ‘कोसळता गावगाडा’ या ऐतिहासिक पुस्तकाच्या लेखिका उल्का महाजन यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रुपाताई कुळकर्णी-बोधी, विलास भोंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना उल्का महाजन यांनी गावापासून सुरू झालेला संघर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचण्याचा रोमांचक उलगडा केला. वैयक्तिक आयुष्यात प्रचंड हाल सहन करून या लढ्यात सहभागी होत खंबीरपणे सोबत असलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांनी संघर्षाची गाथा मांडली. रायगड जिल्ह्यात दलित अत्याचाराविरोधापासून लढ्याला सुरुवात झाली. पुढे या भागातील कातकरी आदिवासींच्या समस्या घेऊन वेठबिगारी, अत्याचार, वर्तमान काळातही गावात पाळला जाणारा जातीभेदाच्या समस्यांसह वन हक्कांचे प्रश्नांसाठी लढा वाढत गेला. हा संघर्ष जातीयवाद आणि सरंजामशाहीच्या राहिलेल्या अवशेषांविरोधातील होता, जे आपल्यासमोर आहेत. मात्र यापुढे समोर न दिसणाºया भांडवलदारांविरोधात लढा सुरू झाला. धनदांडगे, मोठमोठ्या कंपन्यांचे भांडवलदार गावगाड्यातील आदिवासी, शेतकरी यांच्या जमिनी पैशांच्या जोरावर बळकावू पाहत आहेत. त्यांच्याविरोधात सामान्य माणसांना घेऊन लढलेला लढा यशस्वी झाला. हाही संघर्ष देशातील धनदांडग्यांच्या विरोधातील होता. मात्र यापुढचा लढा या देशातील जमिनी बळकावू पाहणाºया आंतरराष्टÑीय कंपन्याविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी मार्ग, रेल्वे कॉरिडॉर, सागरीमाला, भारतमाला या मनोहारी नावाने हे षड्यंत्र चालले आहे. गावातील सरंजामांची ताकत स्थानिक व्यवस्था व नेत्यांशी जुळली असते. हा लढा कठीण आहे, कारण या न दिसणाºया भांडवलदारांनी स्थानिक संस्था, पोलीस व्यवस्था, न्यायव्यवस्था, माध्यमे यांनाही गुलाम बनविले असल्याचे वास्तव महाजन यांनी अनेक अनुभवातून मांडले. त्यांच्याच तालावर नाचणारे सरकार सामान्य माणसांच्या हक्काचा आवाज असलेले संविधान व लोकशाही उद्ध्वस्त करण्याची तयारी करीत आहे.विकासाच्या नावाखाली देशाचा ४० टक्के भूभाग परकीय सत्तांच्या हातात जाणार आहे. हिटलरशाही व फॅसिजम आणू पाहणारे सरकार मदतीला येणार नाही, त्यामुळे या संघर्षात मदतीसाठी समाजाने तातडीने जागे होण्याची गरज असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.डॉ. रुपाताई कुळकर्णी-बोधी यांनी अध्यक्षीय विचार मांडले. प्रास्ताविक आकांक्षा प्रकाशनच्या अरुणा सबाने यांनी व संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले. प्रा. रेखा ठाकरे यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर