शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ मदत हवीय? डायल करा ११२ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2023 08:00 IST

Nagpur News जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२वर संपर्क साधून कठीण प्रसंगात पोलिसांची मदत घेतल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवर्षभरात ८७ हजार ३३ नागरिकांनी घेतला लाभदहा मिनिटांत मिळते मदत

दयानंद पाईकराव

नागपूर : धावपळीच्या युगात अनेकदा व्यक्तीला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. गृहिणींना कुटुंबातून छळण्याच्या घटना घडतात. अडचणीत असलेल्या अशा नागरिकांसाठी पोलिसांनी डायल ११२ ही सेवा सुरू केली असून, फोन केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत संबंधित व्यक्तीला पोलिसांची मदत मिळत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२वर संपर्क साधून कठीण प्रसंगात पोलिसांची मदत घेतल्याची धक्कादायक माहिती आहे.

काय आहे डायल ११२ मराठी?

-डायल ११२ ही अडचणीत असलेल्या सर्व व्यक्तींसाठी महत्त्वाची सेवा आहे. या सेवेवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीला दहा मिनिटांच्या आत पोलिस संपर्क साधून हवी ती मदत करतात. या सेवेप्रती नागरिक जागरूक झाले असून, मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे.

वर्षभरात ८७ हजार ३३ कॉल्स

-नागपूर शहरात डायल ११२ या सेवेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अडचणीत असलेले व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊन अडचणीच्या काळात पोलिसांची मदत घेत आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत नागपूर शहरात तब्बल ८७ हजार ३३ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतल्याची नोंद नागपूर पोलिसांनी केली आहे.

१०० टक्के कॉल पूर्ण

-वर्षभरात ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२ सेवेचा लाभ घेतला आहे. या सर्वच कॉलला नागपूर पोलिसांनी प्रतिसाद देऊन संबंधित नागरिकांना मदत मिळवून दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

१०८ वाहने २४ तास कार्यरत

-अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या डायल ११२ ही सेवा २४ तास कार्यरत असते. सकाळ, दुपार, सायंकाळ आणि रात्रीलाही या सेवेवर संपर्क साधल्यास नागरिकांना त्वरित मदत करण्यात येते. त्यासाठी नागपूर शहरात २४ तास १०८ वाहने सज्ज राहतात.

१८५ कर्मचाऱ्यांचा ताफा

-डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर त्वरित पोलिसांच्या वतीने मदत करण्यात येते. त्यासाठी नागपूर शहर पोलिस विभागात १८५ कर्मचाऱ्यांचा ताफा कार्यरत असून, ते अडचणीतील नागरिकांना त्वरित मदत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.

दहा मिनिटांच्या आत मदत

-आपत्कालीन स्थितीत डायल ११२ हा क्रमांक डायल केल्यानंतर संबंधित पोलिस तक्रारकर्त्या व्यक्तीची अडचण जाणून त्याची नोंद करतात. त्यानंतर अवघ्या १० मिनिटांत संबंधित व्यक्तीला मदत पोहोचविण्यात येते. त्यामुळे ही सेवा अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.

सर्वाधिक तक्रारी कशाच्या?

-नागपूर शहरात गेल्या वर्षभरात ८७ हजार ३३ नागरिकांनी डायल ११२वर संपर्क साधून मदत मागितली आहे. यात सर्वाधिक तक्रारी कौटुंबिक वादाच्या असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अडचणीतील व्यक्तींसाठी डायल ११२ सज्ज

‘डायल ११२’ या सेवेंतर्गत अडचणीत असलेल्या व्यक्तीला अवघ्या १० मिनिटांत पोलिसांच्या वतीने मदत पोहोचविण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी या सेवेचा लाभ घेऊन आपल्या समस्येचे निराकरण करावे.

-अश्वती दोरजे, सहपोलिस आयुक्त, नागपूर शहर

 

.........

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिस