शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

संविधान बदलण्याची मानसिकता ठेचण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:15 IST

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, पण त्याच पक्षाचे लोक संविधान बदलायला निघाले आहेत. ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांचा राईनपाडा घटनेवरून सरकारवर हल्लाबोलसोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालणारा कायदा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने केलेल्या मारहाणीत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. अफवेमुळे या पाच जणांना मारण्यात आले. काही जण लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले, पण त्याच पक्षाचे लोक संविधान बदलायला निघाले आहेत. ही मानसिकता ठेचून काढण्याची गरज आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चेच्या माध्यमातून कपिल पाटील यांनी राईनपाडा येथील नाथपंथी डवरी समाजातील पाच जणांना मारहाण करून त्यांची हत्या केल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. धनंजय मुंडे यांनी हा विषय लावून धरला. ते म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी राईनपाडाची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. समाजातील गरीब, दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकातील या पाच जणांची इतक्या अमानुषपणे हत्या होते; परंतु समाजातून दबका आवाज वगळता निषेधाचा तीव्र सूर उमटत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.अफवेच्या गैरसमजातून पाच जणांना ठेचून मारले जाते. पाच निरपराधांना कोंडून त्यांची ठेचून हत्या जमाव करतो. या जमावाला कायद्याची भीती का वाटत नाही. अशी हत्या करण्यास समाज का प्रवृत होतो. या झुंडशाहीमागचा मास्टमार्इंड, यामागची विचारसरणी शोधावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. राईनपाडा प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या नियंत्रणात एसआयटी गठित करून या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यात यावी. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत व कुटुंबातील व्यक्तीस नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.आंबा खाल्ल्याने पुत्र प्राती होते. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मनू मोठा आहे. अशा मानसिकतेचे राईनपाडा येथील बळी आहेत. भटक्या जमातीची जात गणना करून त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. या समाजातील लोकांना पोलिसांनी ओळखपत्र द्यावे, अशी मागणी कपिल पटील यांनी केली.अफवांमुळे वेगवेगळ्या घटनात २२ जणांचे बळी गेले आहे. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी टास्क फोर्स गठित करण्यात यावे. अफवांना आळा घालण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅपवरील चुकीच्या मेसेजला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नीलम गोºहे यांनी केली. रामहरी नूपवर म्ह्णाले, पुरोगामी राज्यात अफवांवर विश्वास ठेवणारा समाज आहे. याचे आत्मचिंतन होण्याची गरज आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला.काँग्रेसचा एकही अध्यक्ष तडीपार नव्हताअल्पकालीन चर्चेत भाई गिरकर यांनी विरोधकांवर टीका करताना काँग्रेसचा अध्यक्ष संविधानानुसार निवडला जात नसल्याचे म्हटले. याचा भाई जगताप यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, आजवर काँग्रेसचे ७२ अध्यक्ष झाले. यात फक्त चार गांधी होते. काँग्रेसचा एकही अध्यक्ष तडीपार नव्हता, असा अप्रत्यक्ष हल्लाबोल भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केला. यावरून सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात गदारोळ निर्माण झाला होता.मुंडे-गोऱ्हे यांच्यात चकमकया अल्पकालीन चर्चेदरम्यान उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दुसऱ्या क्रमाकांवर शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांचे नाव पुकारले. त्यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चर्चेत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने त्यांना बोलू द्यावे, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहाचे कामकाज नेमके कोणत्या नियमानुसार चालावे, यावर खल झाला. यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मला बोलू द्यायचे नाही का? यावर मुंडे म्हणाले, सदनाच्या दोन सदस्यांत अशाप्रकारे गैरसमज होत असेल तर कामकाजाला अर्थ राहत नाही. तार्इंना मी कशाला थांबवू, त्यानंतर उपसभापतींनी मुंडे यांना बोलण्यास सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Dhananjay Mundeधनंजय मुंडे