शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाण्याच्या व्यवस्थापनासाठी बिग डाटा संकल्पनेची गरज : विनोदकुमार तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:04 IST

पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले.

ठळक मुद्देनीरीत कार्यशाळेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर वाढले असून पाण्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी पाण्याचे योग्य मोजमाप करून बिग डाटा संकल्पनेच्या अंमलबजावणीची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र वॉटर रिसोर्सेस रेग्युलेटरी अ‍ॅथारिटीचे सदस्य विनोद कुमार तिवारी यांनी केले.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) आयोजित पर्यावरणीय मॉडेलिंग : भविष्यातील समस्येचे निराकरण या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी गांधीनगरचे प्राध्यापक आणि नीरीचे माजी संचालक डॉ. आर. एन. सिंग, नीरीच्या हवामान बदल विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जे. एस. पांड्येय, डॉ. आर. बी. बिनिवाले, वरिष्ठ प्रधान संशोधक डॉ. आभार सारगावकर उपस्थित होत्या. डॉ. विनोद कुमार तिवारी म्हणाले, भूगर्भातील पाण्याचा वापर सिंचनासाठी आणि उद्योगांसाठी बंद करण्याची गरज असून या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील पाणी व्यवस्थापन हे एक मोठे आव्हान असून त्यावर बिग डाटा, रिअल टाइम डाटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मात करता येणे शक्य आहे. डॉ. आर. एन. सिंग यांनी गणितीय मॉडेल पाण्याच्या व्यवस्थापनासाठी प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रालॉजीचे माजी संचालक डॉ. आर. डी. सिंग यांनी पाण्याच्या व्यवस्थापनात हायड्रालॉजिकल मॉडेलिंगचे महत्त्व विशद केले. डॉ. के. सी. गौडा, डॉ. पी. व्ही. तिंबाडीया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेला आयआयटी दिल्लीच्या प्रो. मैथिली शरण, आयआयटी रुरकीचे प्रो. बी. आर. गुर्जर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. सचिन घुडे, निरीच्या आशा पूर्णा मरंडी, स्वप्निल श्रीवास्तव उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. जे. एस. पाण्ड्येय यांनी केले. आभार डॉ. सारगावकर यांनी मानले.

 

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर