शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

NDA फुटणार, पाच पक्ष इंडियात येणार, कॉंग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांचा दावा

By आनंद डेकाटे | Updated: August 27, 2023 18:21 IST

४५० जागांवर वन टू वन फाईट

नागपूर : इंडिया' तयार होताच, 'वन मॅन' शो असलेली एनडीएची आघाडी खळबळून जागी झाली आहे. परंतु इंडियाच्या मुबंई बैठकीपूर्वी एनडीएत फुट पडणार आहेत. एनडीएत असलेले ४ ते ५ पक्ष संपर्कात असून ते इंडियात सहभागी होणार आहेत, असा दावा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी रविवारी नागपुरात पत्रपरिषदेत केला.

शर्मा म्हणाले, '. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भ्रष्टाचार वाढला आहे. आता तर 'कॅंग' चा अहवाल आला आहे. ७ प्रकल्पाबाबत ताशेरे ओढले आहेत. आता ईडी, सीबीआयची चौकशी बसवा, असे आव्हान देताना मोदी सरकारच्या दुहेरी धोरणामुळे आतापर्यंत कारवाई करण्यात आलेल्या एकांवरही दोषसिद्धता झाली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केवळ 'इव्हेंन्ट' करून देशाला भ्रमित केले जात आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे फाईलबंद का, ब्रुजभूषण यांच्यामुळे कुस्तीगीरांवर झालेला अन्याय व जागतिक संघटनेकडून कुस्तीगीर संघटनेवर केलेली निलंबनाची कारवाई झाली. भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात मुंबईच्या बैठकीनंतर कॉंग्रेस संसद ते रस्त्यांवरची लढाई लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

२०२४ मध्ये एनडीए विरुद्ध इंडिया अशी थेट लढत होईल. तब्बल ४५० जगांवर वन टू वन फाईट होईल. इंडिया जिंकेल. अमेठीत कॉंग्रेसचा ब्लॉक अध्यक्षही उभा राहिला तर स्मृती इराणी यांची जमानत जप्त होईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रपरिषदेत शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

शरद पवार इंडियाचे मार्गदर्शक'इंडिया'त नेतृत्वाचा प्रश्न नाही. अहंकारी सरकारला खाली खेचणे महत्वाचे आहे. नेतृत्व कुणीही करू शकतो. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत, त्यांचे मार्गदर्शन इंडियाला मिळत असून ते इंडियात महत्वाच्या भूमिकेत असल्याचे शर्मा म्हणाले. महाराष्ट्र व बिहारमध्ये चमत्कार घडेल म्हणूनच फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. राज्यात ४० पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडीला मिळेल असा दावाही त्यांनी केला.

तिसऱ्या आघाडीला भाजपचे पाठबळतिसऱ्या आघाडीचा प्रयोग यावेळी सुद्धा होऊ शकतो. परंतु अशा आघाडीला भाजपचे पाठबळ राहिले आहे. यावेळीही प्रयोग होऊ शकतो. मतविभाजनासाठी असा फ्रंट देशाला धोका देत आहे. नागरिकांना आता सर्व समजले आहे. मायावती व ओवैसी यांच्याबद्दल कायम संभ्रम असतो. तर, आप इंडियाचा घटक आहे. मात्र, जनविरोधी वा भ्रष्टाचाराची बाब पुढे आल्यास विरोध करण्यास मागेपुढे बघितले जाणार नाही, असे असे शर्मा यांनी स्पष्ट केले. वंचितचे प्रकाश आंबेडकर हे इंडियात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ओपीनीअन पोल बनावट, जागेवर बसून सर्वेक्षण२०१४ पुवीं दहा निवडणूकपुर्व सवेंक्षण झाले. त्यानंतर प्रत्येक महिन्यात एक असे एकूण शंभरावर ओपीनीअन पोल झाले आहेत. २०० सॅम्पलमधून १४० कोटी जनतेचे मत मांडले जाते. हे सर्व बनावट आहे. हरीयाणात कॉंग्रेसला दोन जागा मिळतील असे सी वोटरने म्हटले होते. कॉंग्रेसने ३१ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीतील नोएडात बसून काही जण अशाप्रकारचे सवेंक्षण करीत असतात. निवडणूक आयोगाने अशा सवेंक्षणावर लक्ष घालावे अशी विनंतीही शर्मा यांनी केली.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर