शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

एसएनडीएल विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

By admin | Updated: July 29, 2016 02:56 IST

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच नागपूर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या एसएनडीएलच्या भोंगळ कारभारामुळे ...

संविधान चौकात बिलाची होळी : कार्यक र्त्यांना अटक नागपूर : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच नागपूर शहराला वीज पुरवठा करणाऱ्या एसएनडीएलच्या भोंगळ कारभारामुळे प्रचंड प्रमाणात वीज बिल वाढले आहे. वाढीव बिल कमी करून या कंपनीच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई करावी. यासाठी माजीमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त नागरिकांनी वाढीव बिलाची होळी करून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ प्रमुख सलील देशमुख यांच्यासह कार्यक र्त्यांना पोलिसांनी अटक केली. नंतर अनिल देशमुख यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना निवेदन देऊ न एसएनडीएलच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. कंपनीने पुढील तीन वर्षात ३० ते २०० टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. वीज बिलाची आकारणी करण्यासाठी एसएनडीएलने लावलेले वेगवेगळ्या पाच कंपन्यांचे मीटर सदोष आहेत. झोपडपट्टीधारकांना दोन-दोन हजारांचे बिल येत आहे. यापूर्वी राज्यात आघाडीचे सरकार असताना सदोष मीटर अहमदाबादला तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यात दोष आढळल्यास ग्राहकांना भरपाई दिली जात होती. परंतु भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर ही प्रक्रिया बंद झाली आहे. एसएनडीएलकडे तक्रार आल्यास ते महावितरणकडे जबाबदारी असल्याचे सांगतात तर महावितरण एसएनडीएलकडे बोट दाखविते. यामुळे ग्राहकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. भाजपने लोकांना दिलेल्या आश्वसनाची पूर्तता करून एसएनडीएलला हद्दपार करावे. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. आंदोलनात माजी आमदार दीनानाथ पडोळे, मनपातील माजी गटनेते वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर, नगरेवक दुनेश्वर पेठे, राजू नागुलवार, ईश्वर बाळबुधे, दिलीप पनकुले, पुरुषोत्तम वाडीघरे, नुतन रेवतकर, रेखा कृपाले, जावेद हबीब, महेंद्र भांगे, नरेंद्र पुरी, विनोद हेडाऊ, रमन ठवकर, सुखदेव वंजारी, गिरीष ग्वालबंशी, सुरेश बारापात्रे, आय.के.पाशा, अनिल खडगी, कादीर शेख,अशोक अडीकने, दिनेश त्रिवेदी, जावेद खान, शैलेंद्र तिवारी, दिनकर वानखेडे, इखरा खान, अलका कांबळे, जानबा मस्के, स्वनील खापेकर, राजेंद्र बढीये, विद्या सेलुकर, प्रशांत बनकर, राजेश आत्राम, गोपाल ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)