शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आव्हाडांचे श्रीरामाबाबतचे वक्तव्य हे षडयंत्रच; विहिंपचे पवार-आव्हाडांवर टीकास्त्र

By योगेश पांडे | Updated: January 4, 2024 15:48 IST

पवारांनी माफी मागावी, आव्हाडांना पक्षाबाहेर करावे : विश्व हिंदू परिषदेची मागणी.

योगेश पांडे, नागपूर : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबाबत केलेल्या वक्तव्यावरून वातावरण तापले आहे. विश्व हिंदू परिषदेने आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत संताप व्यक्त केला आहे. आव्हाडांनी केलेले वक्तव्य हे एका षडयंत्राचाच भाग असून त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्याला मौन स्वीकृती आहे. पवार यांनी या प्रकरणात तातडीने माफी मागण्याची विहिंपच्या महाराष्ट्र व गोवा क्षेत्राचे मंत्री गोविंद शेंडे यांनी मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे हे मुखर्तापूर्ण व जाणुनबुजून केलेले वक्तव्य आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत ते बोलले. पवारांनी या वक्तव्याला विरोध केला नाही व याचाच अर्थ त्यांचीदेखील याला मौन स्वीकृती आहे. आव्हाड यांचे हे वक्तव्य भगवान राम, हिंदू धर्मीय व सनातन संस्कृतीचा अपमान आहे. लोकांमध्ये त्यांच्याविरोधात संताप आहे. आम्ही कायदेशीर सल्ला घेत असून त्या दिशेने आम्ही पावले उचलू. तसेच पोलीस ठाण्यात तक्रारीदेखील नोंदविणार आहोत. शरद पवार यांनी या विषयावर स्वत:ची भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांच्या समोर वक्तव्य होत असतानाच त्यांनी थांबवायला हवे होते किंवा नंतर स्पष्टीकरण द्यायला हवे होते.

शरद पवार यांनीदेखील हिंदू समाजाची माफी मागावी. तसेच आव्हाड यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्यांना पक्षातून बाहेर काढावे, असे प्रतिपादन गोविंद शेंडे यांनी केले. २२ जानेवारी रोजी अयोध्येत नवनिर्मित राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. ही बाब राष्ट्रवादीच्या या नेत्यांना पचलेली नाही. देशभरात हिंदुत्वाचा हुंकार असताना हा खोडसाळपणा करण्यात येत आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. समाज राममय झाला असून समाजावर अशा वक्तव्याचा काहीही परिणाम होणार नाही. राम बहुजन किंवा हिंदूंचा नसून देशातील प्रत्येक व्यक्तीचा आहे, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंची आव्हाडांच्या मताशी सहमती का?

विहिंपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी प्रखर भूमिका घेतली होती. मात्र आता ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत, त्या आव्हाडांच्या या मताशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का असा सवाल शेंडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :nagpurनागपूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाड