शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

आंबेडकर जयंतीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी उघडपणे माफी मागावी

By योगेश पांडे | Updated: April 10, 2025 18:45 IST

जनसंघर्ष समितीची मागणी : केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहीले पत्र

योगेश पांडे  - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गृहमंत्री अमित शाह यांच्या आवाहनानंतर नक्षलवादी संघटनांनी शांतता चर्चेसाठी तयारी दाखविली आहे. मात्र या संघटनांशी काही अटींवरच चर्चा करावी अशी भूमिका नक्षलवादी क्षेत्रात काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने घेतली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी नक्षलवाद्यांनी उघडपणे माफी मागावी तसेच शहरांतील व्हाईट कॉलर सहकाऱ्यांची नावे जाहीर करावीत अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री शाह यांना पत्रदेखील पाठविले आहे.

नक्षलवाद्यांनी आतापर्यंत हजारो निष्पाप आदिवासी व नागरिकांना क्रूरपणे मारले आहे. त्यांनी सरकारसमोर शांतता चर्चेची विनंती केली आहे ही चांगली बाब आहे. मात्र त्याअगोदर काही अटींचे त्यांना पालन करायला लावणे अनिवार्य आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, सीपीआय (माओवादी) पक्षाच्या भूमिगत नेत्यांनी उघडपणे समोर येऊन हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी. तसेच भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी जाहीर करावे. माओवादी चळवळीतील नेते मुख्य प्रवाहातील संवैधानिक प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक आहे हे त्यांनी जनतेला सांगावे. त्यांनी सीपीआय (माओवादी) पक्ष विसर्जित करावा व सर्व शस्त्रे तसेच दारुगोळा पोलिसांच्या हवाली करावा. माओवादी पक्षाच्या सरचिटणीसांपासून ते पीएलजीएच्या शेवटच्या नक्षलवाद्यापर्यंत सर्वांनीच सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करावे अशी अट टाकण्यात यावी. तसेच माओवाद्यांनी त्यांच्या शहरी आघाडीच्या संघटना आणि कार्यकर्त्यांची नावे उघडपणे जाहीर करावीत. त्यांच्याशी निगडीत शहरी संघटना बरखास्त कराव्या ही महत्त्वाची अट त्यांच्यासमोर टाकायला हवी, अशी पत्रातून जनसंघर्ष समितीने गृहमंत्र्यांकडे मागणी केल्याची माहिती अध्यक्ष दत्ता शिर्के यांनी दिली आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर