शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा म्हणतात, बच्चू कडू यांचं स्वत:वरचं नियंत्रण गेलं; उद्धव ठाकरेंवरही केली खोचक टीका

By कमलेश वानखेडे | Updated: September 30, 2022 17:37 IST

उद्धव ठाकरे एक अपरिपक्व राजकारणी असल्याची टीका

नागपूर : बच्चू कडू यांचे स्वत:वरचे नियंत्रण गेले आहे. त्यांनी स्वत:ला सांभाळायला पाहिजे. कार्यकर्त्यांना मारहाण, असं वागणं हा कार्यकर्त्यांचा अपमान आहे. कार्यकर्ता आहेत म्हणून आम्ही आहेत, कार्यकर्त्यांचा सन्मान बच्चू कडू यांनी ठेवायला हवा, अशा शब्दात खासदार नवनीत राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधत त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला. 

नागपुरात पत्रकारांशी बोलताना राणा यांनी बच्चू कडू यांच्यासह माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नेम साधला. उद्धव ठाकरे हे एक अपरिपक्व राजकारणी आहेत. त्यांच्या राजकीय वक्तव्यावरुन ते परिपक्व आहे असे वाटत नाही. ते बाळासाहेबांचे सुपूत्र आहेत असंही वाटत नाही. ५६ वर्षे ते त्यांच्या परिवारात आहे. मात्र त्यांनी १० टक्केही मिळवलं नाही. त्यांनी बाळासाहेबांचे सर्वस्व गमावलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे या जमिनीवर राहून संघर्ष करु शकत नाही, अशी खोचक टीका राणा यांनी केली.

धनुष्यबाण शिंदे गटाकडे असेल

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना येवढा संघर्ष केला असता तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद असती. त्यांच्या दसरा मेळाव्यात जबरदस्तीने लोक आणले जाणार आहेत. हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे विचार ऐकायला शिंदे यांच्या मेळाव्यात लोक येतील. निवडणूक आयोग शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देणार. धनुष्यबाण शिंदे यांच्याकडे असेल, असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाBacchu Kaduबच्चू कडूUddhav Thackerayउद्धव ठाकरे